वाल्हे, ता. १५ : वाल्हे, पिंगोरी तसेच दौंडज परिसरात पडत असलेल्या पावसामुळे ओढे-बंधाऱ्यांमध्ये प्रवाहित झाले आहे. दुष्काळामध्ये परिसरात जवळपास वीस साखळी बंधारे बांधण्यात आले असून जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत केलेल्या खोलीकरणावेळी दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद झाला. खोलीकरण केलेले पाझरतलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. असा विश्वास आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
वाल्हेजवळील (ता.पुरंदर) दातेवाडी येथे शनिवारी (ता. १४) शिवतारे यांच्या हस्ते बंधाऱ्यामधील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. त्यावेळी शिवतारे बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये शिवतारे यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी सभापती अतुल म्हस्के, उद्योजक अथर्व
पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश इंगळे, प्रदीप चव्हाण, शंतनू नवले, रोहित भोसले, संतोष बोडके, अवधूत गोंजारी, गणेश मुळीक आदि
उपस्थित होते.
पिंगोरी- दौंडज परिसरात झालेल्या पावसामुळे तेथील बंधारे भरून जास्तीचे पाणी ओढ्याद्वारे वाल्हेच्या दिशेने आल्याने आडाचीवाडी व वाल्हेच्या पश्चिमेकडील ओढे-नाले बंधारे पाझरतलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया आमदार विजय शिवतारे यांनी दिली.
युवा सेनेचे उपतालुका प्रमुख सागर भुजबळ यांनी प्रास्ताविक तर शिवसेनेचे युवा नेते राहुल यादव यांनी आभार मानले.
04691
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.