वाल्हे, ता. ४ : शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असलेले पाणंद रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे. हे रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते, बियाणे तसेच इतर साहित्य वेळेत पोहोचवता येणार असून, शेतमालाची वाहतूक करताना येणाऱ्या
समस्या दूर होणार आहेत, असे प्रतिपादन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले.
महसूल सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत आडाचीवाडी(ता.पुरंदर) येथे रविवारी (ता. ०३) येथील पाणंद रस्त्याचे भूमिपूजन राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या एकोप्याचे आणि सहकार्याचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, सरपंच सुवर्णा पवार, सूर्यकांत पवार, प्रशांत पवार, अलका पवार, प्रशांत पवार, रामदास पवार, लता पवार, प्रतिभा पवार, दिगंबर पवार, बजरंग पवार, शिवाजी गायकवाड, शिवाजी पवार आदि ग्रामस्थांसह मंडल अधिकारी भारत भिसे उपस्थित होते.
पुढे बोलताना राजपूत म्हणाले की, आडाचीवाडी येथील पाणंद रस्ते सिमेंटचे मजबूत होत असल्याने रस्त्यावरून गावात होणारे वादविवाद थांबतील
आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अधिक सुलभता लाभेल. हा रस्ता म्हणजे त्यांच्या हक्काचा आणि जगण्याशी जोडलेला मार्ग आहे.
दरम्यान, यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते पाणंद रस्त्याच्या दुतर्फा आंबा व जांभुळाच्या झाडांची लागवड करण्यात आली.
येथील रहिवासी व रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी प्रास्ताविक केले. हनुमंत पवार यांनी आभार मानले.
5002
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.