SSC HSC Board exam
SSC HSC Board exam  Sakal
पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो; मन मे हैं विश्‍वास, होंगे कामयाब...

सकाळ वृत्तसेवा

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.

पुणे - दहावी (SSC) आणि बारावीचे (HSC) विद्यार्थी (Student) दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी (Written Exam) समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावयाची काळजी...

परीक्षेची व्याप्ती

१) दहावीचे परीक्षार्थी - १६,२५,३११

२) बारावीचे परीक्षार्थी - १४,७२,५६२

३) परीक्षा पार पाडणारे कर्मचारी - १, ७५,०००

४) परीक्षा केंद्र -

इयत्ता - प्रचलीत - आत्ताचे

दहावी - ५०११ - २१,३२४

बारावी - २९४३ - ९६३०

ठळक बाबी

- दहा मिनीटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार

- ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त १५ मिनिटे

- ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी अतिरिक्त ३० मिनिटे

- विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र येईल, अशी व्यवस्था बोर्ड करणार

- विद्यार्थी संख्या अधिक असेल तर शाळेच्या जवळचेच परीक्षा केंद्र

- गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्यात येणार

विद्यार्थ्यांनो हे करा

- लेखनाचा सराव

- विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करा

- परीक्षेतील वेळेचे नियोजन

- प्रत्येक धड्याखालील स्वाध्यायाचे प्रश्न

- अभ्यासाची जागा निश्चित करा

विद्यार्थ्यांनो हे करू नका

- रात्री उशिरापर्यंत जागरण

- नकारात्मक विचार करणे

- समाजमाध्यमे आणि लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टी टाळा

- शेवटच्या क्षणाला भरभर अभ्यास टाळा

परीक्षेच्या दिवशी काय कराल

- आपल्याच शाळेत परीक्षा असल्याने विनाकारण भीती बाळगू नका

- परीक्षेच्या वेळेआधी केंद्रावर दाखल व्हा

- प्रश्नपत्रिका हातात आल्यावर शांतपणे वाचा

- उत्तरपत्रिकेवरील माहिती शांतपणे लिहा

- सोपे प्रश्न आधी सोडवा, सर्व प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा

- पर्यवेक्षक आपल्याच मदतीसाठी, काही शंका वाटल्यास नक्की विचारा

पालकांनो ही घ्या काळजी

- मुलाच्या आरोग्याची

- रात्री ११ ते सहा ६ मुलांनी झोप घेतली पाहिजे

- परीक्षेच्या काळात पाल्याला आनंदी ठेवा

परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळावे

शाळांमध्येच परीक्षा केंद्र असल्याने गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि केंद्रप्रमुखांची आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्राला बट्टा लागेल असे वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर देशाचे भविष्य अवलंबून आहे. कॉपीसारखे प्रकार घडल्यास प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांचे खच्चीकरण होते.

कोरोनाचा विचार करून परीक्षेला समोर जाणे विद्यार्थ्यांनी टाळावे. परीक्षेला अर्धातास वाढवून दिला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचावी आणि निश्चित स्वरूपाने येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आधी सोडवावी. धड्याखालील स्वाध्याय सोडवावेत, कारण ८० टक्के प्रश्न त्यातून येणार आहे.

- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT