लोणावळा, ता. २८ : भागवत महात्म्य कलियुगातील भक्तीचा दीप उजळत असून, भगवंताचे नामस्मरण हाच उद्धारमार्ग असल्याचे प्रतिपादन देवी चित्रलेखाजी यांनी केले.
येथील श्री नारायणी सेवा संस्थान यांच्या वतीने श्री नारायणी धाम येथे श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथा भक्ती, ज्ञान व वैराग्याचा त्रिवेणी संगम असल्याचे चित्रलेखाजी यांनी सांगितले. देवी चित्रलेखाजी यांच्या अमृतवाणीने दररोज दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत श्रीमद्भागवत कथा वाचन, प्रवचन संपन्न होत असून, श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचे, भक्ती-ज्ञान-वैराग्याचे सखोल विवेचन भाविकांना अनुभवता येणार आहे. मंगल कलश यात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दररोज श्रीमद्भागवत महात्म्य, प्रथम स्कंध व भगवानांचे २४ अवतार, व्यास-नारद संवाद, प्रल्हाद कथा, अजामिल कथा, गजेन्द्र मोक्ष, समुद्रमंथन, वामन अवतार, श्रीराम व श्रीकृष्ण जन्म, नंदोत्सव, गोवर्धन लीला, रुक्मिणी विवाह, सुदामा चरित्र आदी प्रसंगांचे कथन केले जाणार आहे. बुधवारी (ता. ३१) कथा विश्रांती व पूर्णाहुतीनंतर रात्री ९ ते १२ या वेळेत सुमधुर भजन संध्या आयोजित करण्यात आली असून, गायक कुंदन मिश्रा यांच्या सादरीकरणाने भक्तीमय वातावरणात कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
श्री नारायणी सेवा संस्थानच्या वतीने भाविकांना कुटुंबासह या दिव्य ज्ञानयज्ञात सहभागी होण्याचे आवाहन करत आध्यात्मिक समाधान व जीवनाला नवी दिशा मिळविण्याची संधी या माध्यमातून साधता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.