दुबई, ता. २१ : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली. अभिषेक शर्मा (७४ धावा) व शुभमन गिल (४७ धावा) या सलामीवीरांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानला सहा विकेट राखून नमवले. भारतीय संघाचा आशियाई करंडकातील सुपर फोर फेरीमधील हा पहिला विजय ठरला.
भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी केली. त्यामुळे पाकिस्तानला २० षटकांमध्ये पाच बाद १७१ धावा उभारता आल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहाने याने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. शिवम दुबेने दोन फलंदाज बाद केले.
अभिषेक व शुभमन या सलामी जोडीने ९.४ षटकांत १०५ धावांची सणसणीत भागीदारी करीत आपले इरादे स्पष्ट केले. गिलने आठ चौकारांसह ४७ धावांची खेळी केली. अभिषेक याने ३९ चेंडूंमध्ये सहा चौकार व पाच षटकारांसह ७४ धावांची खेळी साकारली. तिलक वर्मा (नाबाद ३० धावा) व हार्दिक पंड्या (नाबाद ७ धावा) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नो हँडशेक
पाकिस्तानचा संघ या लढतीत क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघातील फलंदाजांना डिवचण्याचा प्रयत्न करीत होता. भारतीय संघाने मात्र याही लढतीत आपली भूमिका कायम ठेवली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी नाणेफेकीप्रसंगी व सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंपासून दूर राहणेच पसंत केले. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. मात्र भारतीय संघाने मैदानातील लढाई रुबाबात जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.