राज-उद्धव एकत्र आल्याने
काही फरक पडणार नाही
गिरीश महाजन; सोलापूरचे देशमुख निष्ठावंत
नातेपुते, ता. २७ ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यामुळे मुंबईची चौफेर प्रगती सुरू आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळे महानगरपालिकांमध्ये आम्हीच सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवू, राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडणार नसल्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. नातेपुते येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अकलूजच्या नगरपंचायत निवडणुकीत बदल झाला आहे. भाजपला या निवडणुकीत दहा हजार मते मिळाली असल्याचे सांगत घराणेशाही संपवणार असल्याचे सांगितले. यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील हे देशमुख यांच्या पक्षप्रवेशासाठी आले नसल्याचे विचारले असता, त्यांना निमंत्रण मिळाले नसेल असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
उद्धव ठाकरे यांच्याविषयी विचारले असता महाजन म्हणाले, नक्कल करणे फार सोपे असते. परंतु बाळासाहेबांच्या विचाराला त्यांनी तिलांजली दिली आहे. वास्तविक आमच्या १०५ जागा होत्या. तरी सुद्धा त्यांनी स्वार्थापायी युती तोडली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडले नव्हते. मंत्रालयात अडीच वर्षांत फक्त चार वेळा आले होते असे सांगत मुंबई महानगरपालिकेत उद्धव आणि राज एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही असे सांगितले.
या पत्रकार परिषदेवेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राम सातपुते, बाबाराजे देशमुख उपस्थित होते.
दोन्ही देशमुख निष्ठावान कुठेही जाणार नाहीत
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी देण्याच्या वादावरून महाजन म्हणाले, विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख हे दोघे निष्ठावंत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. थोडा वेळ राग असतो, कालांतराने दोघांचाही राग कमी करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोघांच्याही संपर्कात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.