पुणे

सुसंवादाने काम केल्यास न्यायव्यवस्था अधिक सक्षम

CD

पुणे, ता. १८ ः ‘‘न्यायाधीश, वकील आणि न्यायालयातील कर्मचारी हे तिन्ही घटक एकत्र येऊन सुसंवादाने, मर्यादा पाळून काम केल्यास न्यायव्यवस्था अधिक सक्षम होईल. न्यायालयातील तणाव कमी करण्याची जबाबदारीही तिन्ही घटकांनीच उचलली पाहिजे,’’ असे आवाहन ठाणे येथील माजी जिल्हा न्यायाधीश अभय शिरसीकर यांनी सांगितले.
‘जन अदालत संस्थे’तर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘न्याय परिवार’ या आभासी परिषदेच्या प्रमुख भाषणात ते बोलत होते. ही परिषद बीड जिल्ह्यातील सरकारी वकील विनायक चंदेल यांच्या आत्महत्येनंतर न्यायव्यवस्थेतील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. वकील, न्यायाधीश आणि कोर्टातील कर्मचारी यांच्यातील व्यावसायिक ताण, आव्हाने आणि त्यावरील उपाय यांवर चर्चासत्र घेण्यात आले. विविध जिल्ह्यांतील न्यायाधीश, वकील आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
माजी न्यायाधीश सुजाता पाटणकर यांनी न्यायालयीन कामकाज सकारात्मक ठेवण्याचे आवाहन केले. न्यायाधीशांनी ज्युनिअर वकिलांवर दुर्लक्ष न करता त्यांच्या कामातून आत्मविश्वास वाढवावा, असे महाराष्ट्र बालहक्क आयोगाच्या सदस्या ॲड. जयश्री पालवे यांनी सांगितले. काही प्रतिनिधींनी न्यायाधीश व वकिलांमध्ये अहंकार व टीका-टिप्पणी टाळून परस्पर आदर ठेवण्याची गरज व्यक्त केली.
ॲड. सुभाष वीर यांनी रोजचा ‘न चालणारा बोर्ड’ सकाळी लवकर संपवून वकिलांचा वेळ वाचविण्याची सूचना केली. वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ पवळे यांनी न्यायाधीश व वकिलांचे नाते योग्य मर्यादेत राहिल्यास पक्षकारांना त्वरित न्याय मिळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
ॲड. सागर नेवसे यांनी ‘न्याय परिवार’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना, प्रत्येक जिल्हा न्यायालयात या तिन्ही घटकांसाठी तणावमुक्ती केंद्र सुरू करण्याची सूचना केली. या संकल्पनेमुळे वकील व न्यायाधीश वर्गातील समस्या सुटून सर्वसामान्यांना जलद न्याय मिळेल, न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल, असे त्यांनी सांगितले. जन अदालत संस्थेच्या वतीने ॲड. देवेंद्र पाटील यांनी तांत्रिक सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT