पुणे, ता. २५ ः राज्याचा २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठीची मंत्री समिती पुन्हा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारमधील सर्व मंत्री सध्या विविध भागांत पाहणी दौरा करत आहेत. या कारणास्तव एक दिवस ही समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली असू शकते, असे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. आता ही बैठक मंगळवारी (ता. ३०) होणार आहे.
मंत्री समितीच्या या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख, ऊस बिले अदा करताना विचारात घ्यावयाचा साखरेचा उतारा, तसेच कारखानदारांच्या विविध अडचणींवर चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे. बैठकीपूर्वी विस्माकडून १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे, तर कर्नाटकच्या सीमाभागातील कारखाने लवकर हंगाम सुरू करण्याची मागणी करत आहेत. कारण, कर्नाटकमधील साखर कारखाने लवकर सुरू झाले तर महाराष्ट्रातील ऊस तिकडे जाऊ शकतो. त्यामुळे आता मंगळवारी होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीची तारीख निश्चित होऊन दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.