पुणे

चांगल्या परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांना गंडा

CD

पुणे, ता. २५ : शेअर बाजारात गुंतवणुकीवर आणि ऑनलाइन टास्कमध्ये चांगला परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकासह तरुणाची ३१ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी सहकारनगर आणि चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिक (वय ६६, रा. धनकवडी) यांना ९ सप्टेंबरला मोबाईलवर लिंक पाठवली. व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये सहभागी केले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचा विश्वास संपादन केला. त्यावर ज्येष्ठ नागरिकाने १९ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यांना कोणताही परतावा देण्यात आला नाही. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
खराडी परिसरातील अन्य एका घटनेत सायबर चोरट्यांनी टेलिग्राम लिंकच्या माध्यमातून फिर्यादीला विविध ‘प्रीपेड टास्क’ देऊन त्यांना पैसे पाठविण्यास सांगितले. प्रत्येक ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यासाठी पैसे मागून, परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तरुणाने ११ लाख ५६ हजार रुपये गुंतवणूक केली. परंतु प्रत्यक्षात परतावा मिळाला नाही. याप्रकरणी एका तरुणाने (वय २४, रा. खराडी) फिर्याद दिली. त्यानुसार चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT