पुणे, ता. २८ : ‘‘हजारो वर्षांचा इतिहास सांगतो की शेती अत्यंत अनिश्चित आणि बेभरवशाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली असून, त्यांना समग्र संरक्षण देणे ही काळाची गरज आहे,’’ असे मत कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
डॉ. मुळीक यांनी २७ सप्टेंबर रोजी वयाच्या ८५व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात विद्यार्थी, मित्र, अधिकारी, शेतकरी, आप्तेष्ट आणि संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी
‘डॉ. बुधाजीराव मुळीक चॅरिटेबल ट्रस्ट’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आणि ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. तानाजी चोरगे यांच्या हस्ते झाले.
डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘शेती हेच सर्व उद्योग आणि व्यवसायांचे मूळ आहे; मात्र दीर्घकाळ त्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत आणि भविष्यकाळात ते अधिक तीव्र होतील. सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत जाहीर करावी तसेच कर्जमाफीची उपाययोजना करावी.’’ या स्नेहमेळाव्यात मान्यवरांनी डॉ. मुळीक यांच्या कार्याचा गौरव केला.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.