पुणे, ता. ७ : सरन्यायाधीशांवर न्यायालयातच बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराचा ऑल इंडिया लॉयर्स युनियन (एआयएलयू), महाराष्ट्र राज्य समितीने निषेध व्यक्त केला आहे.
या घटनेने कायदेशीर बंधुत्व, राजकीय पक्ष आणि समाजाच्या मोठ्या भागात व्यापक निंदा उमटली आहे. हा सर्वोच्च न्यायालय आणि स्वतंत्र न्यायपालिकेवर स्पष्ट हल्ला आहे. हा प्रकार राष्ट्राच्या विवेकवादासाठी धक्कादायक आहे, असे ‘एआयएलयू’ने नमूद केले आहे. या घटनेची तत्काळ निष्पक्ष तपासणी करावी, तसेच दोषी आणि त्याच्या मागील कोणत्याही उत्तेजक किंवा षड्यंत्रकारांवर जलद आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एआयएलयूचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वावळकर आणि सरचिटणीस ॲड. चंद्रकांत बोजगर यांनी केली आहे.