पुणे, ता. २४ : ‘‘स्थानिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धत्तीने संवर्धन आणि संरक्षण न झाल्यास मनुष्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे. सृष्टी वाचवण्याची दृष्टी आपल्यात निर्माण व्हायला हवी. त्याचवेळी पर्यावरणासाठी अधिक आणि योग्य कार्य आपल्या हातून घडेल.’’ असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे दिला जाणारा ‘जलमित्र पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित पटनाईक यांना बुधवारी डॉ. प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यंदा या पुरस्काराचे तेरावे वर्ष असून, यावेळी ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, राज्याच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्राच्या पुणे शाखेचे अध्यक्ष अनिल पाटील, जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी आदी उपस्थित होते. यावेळी वनराईचे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना लक्षवेधी सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. पटनाईक म्हणाले, ‘‘चिलिका सरोवर मृतावस्थेत असल्याचे घोषित करण्यात आले होते. वैज्ञानिक आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रिकरणातून त्या सरोवराचे पुनरूज्जीवन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो, याचे आम्हाला समाधान आहे. सातत्याने विविध माध्यमातून निसर्गासाठी कार्य करत राहणे हेच आमचे ध्येय आहे.’’
अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले.
---------------
फोटो ः 79435
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.