पुणे, ता. २ : ‘‘दोन भाषांसह तिसरी भाषा पहिलीच्या मुलांवर लादणे हा सरकारचा मूर्खपणा आहे. त्यांना मुलांचे शिक्षण, मेंदू, मानसशास्त्र याबाबत कोणतीही समज नाही,’’ अशी टीका बालशिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केली.
रोटरी क्लब पर्वती यांच्यातर्फे त्यांना उत्कृष्ट कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा डॉ. वृषाली हिरे, सचिव मानसी कऱ्हाडकर, ज्ञानप्रबोधिनीचे गिरीश बापट आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, ‘‘देशात आदर्श शैक्षणिक वातावरण असूनही ६५ टक्के मुले तिसरी, चौथीत जाऊनदेखील वाचन आणि लेखन नीट करू शकत नाहीत. हा मूलभूत पातळीवरील गंभीर प्रश्न आहे. शिक्षण आणि आनंद वेगळं नसून एकत्रच आहेत, ही संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शालेय काळ हा मुलांची प्रतिभा विकसित करण्याचा वेळ असतो.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.