कर्वेनगर, ता. ५ : परिसरातील राजाराम पूल सध्या गंभीर दुर्लक्षामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापला आहे. काही वर्षांपूर्वी हा पूल ‘सेल्फी पॉइंट म्हणून पसंतीचे ठिकाण होते. सायंकाळच्या वेळी नदीकाठी येणाऱ्या नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हे विरंगुळाचे ठिकाण बनले होते. मात्र, सध्या परिसराला वेढलेल्या कचऱ्यामुळे नागरिक येथे येणे टाळत आहेत.
पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पदपथावर प्लास्टिक बाटल्या, अन्न, कपडे आणि दुर्गंधी पसरविणाऱ्या ओल्या कचऱ्याचे ढीग साचून राहात आहेत. यामुळे परिसराचे सौंदर्य पूर्णपणे हरवले असून, नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे. विठ्ठल मित्र मंडळाकडून या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून नियमित होत नसलेल्या सफाईमुळे पुन्हा परिसरात कचरा साठून राहत आहे.
‘राजाराम पूल हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही तर तो कर्वेनगर, वारजे आणि सिंहगड रस्ता परिसराचा एक प्रतीकात्मक दुवा आहे. त्यामुळे त्याचे सौंदर्य आणि स्वच्छता टिकवून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’, असे स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या विठ्ठल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक रहिवासी विशाल रामदासी यांनी सांगितले की, ‘राजाराम पूल परिसर हा एक सुंदर पर्यटनस्थळ बनू शकला असता, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो कचरा डेपो बनला आहे.’
राजाराम पुलावरील कचरा नियमित उचलला जातो. पुलावर स्वच्छता ही करण्यात येत आहे. मात्र, वाहनातून येणाऱ्या काही नागरिकांकडून येथे कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यातून त्यांचे पत्ते शोधून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
- संदीप चव्हाण, वरिष्ठ आरोग्य निरीक्षण, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.