Allowance 
पुणे

बेरोजगारांना मिळणार पगाराच्या ५० टक्के भत्ता

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना काळात नोकरी गमावलेल्या नोकरदारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अटल बीमीत व्यक्ती कल्याण योजने'अंतर्गत इएसआयसीने बेरोजगार भत्त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. दोन वर्षे नोकरी करून 24 मार्च 2020 ते 30 जून 2021 दरम्यान बेरोजगार झालेल्या कामगारांना ही वाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कर्मचारी इएसआयसीमध्ये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जे कामगार बेरोजगार झाले. त्यांच्यासाठी नियम शिथिल करून ही वाढ देण्यात येत आहे. सुरवातीला 31 डिसेंबर 2020 पर्यंतच ही योजना लागू करण्यात आली होती. पूर्वी मिळणाऱ्या सरासरी पगाराच्या 25 टक्के भत्ता देण्यात येत होता. आता मात्र तो 50 टक्के करण्यात आला आहे. हा भत्ता जास्तीतजास्त 90 दिवसांचा असेल. तो नोकरीवरून काढून टाकल्यानंतर 30 दिवसांनी दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपला अर्ज www.esic.in या संकेतस्थळावर लॉगइन करून भरावा. त्यानंतर त्याची प्रिंट, आधार कार्ड, पासबुक किंवा चेकच्या प्रतीसह आपल्या जवळच्या इएसआयसीच्या कार्यालयामध्ये जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगार गमावणाऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळते. हा एक प्रकारे बेरोजगारी भत्ता असतो. ज्याचा लाभ त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो ज्याच्या मासिक पगारातून इएसआय योगदान कापले जाते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT