Farmers on Punjab Elections esakal
Punjab Assembly Election 2022

कृषी कायद्यांबद्दल पंजाबच्या शेतकऱ्यांत अजूनही राग

निवडणुकीनंतर आंदोलनाचा पवित्रा, सर्वच राजकीय पक्षांबद्दल शेतकऱ्यांना राग

- मंगेश कोळपकर

गुरूदासपूर: कृषी कायदे रद्द झाल्यावर हमी भावासह अन्य काही सुधारणा न झाल्यामुळे पंजाबमधील शेतकरी अजूनही संतप्त आहे. निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर येवो, ठोस उपाययोजना न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी ठामपणे प्रदीर्घ काळ आंदोलन केले. त्यामुळे केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आता विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. पंजाबमध्ये सुमारे 70 टक्के शेतकरी आहेत. राज्याच्या शहरी भागात राजकीय मुद्दे असले तरी, ग्रामीण भागात मात्र, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे कळीचे असल्याचे दिसून आले.

निवडणुकीसाठी बहुतेक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. परंतु, त्यात शेतकरी, त्यांच्या पिकांना हमी भाव, अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा, बी-बियाणांची खरेदी, वीज दर आदींबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तसेच केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी पुरेशी उपाययोजना झालेल्या नाहीत, असे गुरुदासपूर जिल्ह्यातील कामोनंगल, मऱड, खासा गावांतील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पठाणकोट, तरणतारण, कपूरथाला, जालंधर, नवाबसाहिब, अमृतसर, पतियाळा आदी जिल्ह्यांतही शेतकरी संघटनांचे पॉकेट मोठे असून या संघटना आपआपल्या स्तरावर शेतकरी आंदोलनाची धग अजूनही तेवत ठेवत असल्याचे शेतकऱ्यांशी चर्चा करताना जाणवले.

या बाबत भारतीय किसान सभेचे पंजाबचे सरचिटणीस मेजरसिंग पुन्नावाल म्हणाले, केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले म्हणजे सगळे काही संपलेले नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना कॉंग्रेसकडून अपेक्षा होत्या. परंतु, त्यांची पूर्तता झालेली नाही. लखीमपूर खेरीमधील दोषी मंत्र्याला अद्याप घरी पाठविण्यात आलेले नाही. उद्योगपतींना धार्जिणे धोरण काय कामाचे ?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त समाज मोर्चाची स्थापना केली. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी 117 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीत उतरण्यास काही संघटनांचा विरोध होता. परंतु, आपला आवाज दाखवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलेच पाहिजे, या विचारातून शेतकरी निवडणूक रिंगणात पावले टाकली आहेत. आमचे उमेदवार किती ठिकाणी विजयी होतील, या पेक्षा शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या मागण्यासाठी जागरूकता निर्माण करायची आहे, असे मोर्चाचे फतेगर साहिबमधील उमेदवार कुलवंतसिंह संधू यांनी स्पष्ट केले.

सनी देओलला फिरू देणार नाही

गुरुदासपूर जिल्ह्यातून लोकसभेवर या पूर्वी अभिनेते विनोद खन्ना गेले होते. त्यांच्यानंतर अभिनेते सनी देओल हे येथून निवडणूक जिंकले. परंतु, निवडून गेल्यापासून ते य़ेथे फिरकलेलेही नाही, असा येथील शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. खन्ना यांचा मतदारसंघाशी संपर्क होता. परंतु, देओल यांचे घर येथे असूनही ते फिरकत नाही. त्यामुळे आता या पुढे ते जिल्ह्यात आले तर, त्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशारा भारतीय किसान सभेचे गुरुदासपूर जिल्हाध्यक्ष लखिंदरसिंग मरड यांनी सकाळशी बोलताना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT