Minimum Balance Penalty Sakal
Personal Finance

Minimum Balance: मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरुच; बँकांनी कमावले 8,500 कोटी रुपये

Minimum Bank Balance: किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल विविध बँका ग्राहकांकडून दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करत आहेत, त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. सरकारी बँकांनी अशाप्रकारे अवघ्या पाच वर्षांत सुमारे 8,500 कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल शेळके

Minimum Balance Penalty: किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल विविध बँका ग्राहकांकडून दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करत आहेत, त्यामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. सरकारी बँकांनी अशाप्रकारे अवघ्या पाच वर्षांत सुमारे 8,500 कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी किमान शिल्लक दंडाच्या नावाखाली बँकांकडून केलेल्या वसुलीच्या आकडेवारीची माहिती दिली. ते लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देत होते. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांकडून किमान शिल्लक दंडाच्या स्वरूपात 8,494 कोटी रुपये कमावले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात 2000 कोटींचा टप्पा पार

सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका कार्यरत आहेत. सर्व 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात किमान बँक शिल्लक दंड म्हणून 2,331 कोटी रुपये कमावले आहेत.

2023-24 या आर्थिक वर्षातील हा आकडा गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक आहे आणि एका आर्थिक वर्षात प्रथमच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची किमान शिल्लक दंडातून केलेली कमाई 2 हजार कोटींच्या पुढे गेली आहे.

गेल्या काही वर्षांतील दंडाचे आकडे

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2022-23 या आर्थिक वर्षात किमान शिल्लक दंडातून 1,855 कोटी रुपये कमावले होते. त्यापूर्वी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 2021-22 मध्ये 1,429 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 1,142 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 1,738 कोटी रुपये किमान बँक शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड म्हणून कमावले होते. अशाप्रकारे, गेल्या पाच वर्षांत दंडातून वसूल केलेली रक्कम अंदाजे 8,500 कोटी रुपये आहे.

एसबीआयने थांबवला दंड

सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आता दंड वसूल करणे बंद केल्यावरही सरकारी बँकांकडून किमान शिल्लक दंड वसुलीचा आकडा वाढत आहे. सर्वाधिक ग्राहक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 2019-20 मध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून शेवटचा दंड आकारला.

तेव्हा एसबीआयने 640 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर SBI ने दंड थांबवला आणि गेल्या 4 आर्थिक वर्षांपासून ते ग्राहकांकडून किमान शिल्लक दंड आकारत नाही.

कोणत्या बँकेने सर्वात जास्त पैसे कमावले?

  • SBI - 640

  • PNB - 1,538

  • इंडियन बँक - 1,466

  • BOB - 1,250

  • कॅनरा बँक - 1,157

  • BOI - 827

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT