Negligible number of womens at India's top companies says study
Negligible number of womens at India's top companies says study Sakal
Personal Finance

Working Women: मारुती असो की टाटा, भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिलांची संख्या सर्वात कमी; काय आहे कारण?

राहुल शेळके

Working Women In Indian Companies (Marathi News): देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपला वाटा झपाट्याने वाढवत आहे. पण देशातील मोठ्या कंपन्या अजूनही पुरुषांच्या ताब्यात आहेत. मोठ्या कंपन्यांच्या उच्च पदांवर महिलांचा वाटा खूपच कमी आहे.

फॉर्च्यून इंडिया आणि एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या मते, फॉर्च्यून इंडिया 500 मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांपैकी केवळ 1.6 टक्के महिला प्रमुख पदांवर आहेत, तर फॉर्च्यून इंडिया नेक्स्ट 500 कंपन्यांच्या बाबतीत हा आकडा पाच टक्के आहे.

डेलॉइटने नुकत्याच केलेल्या अभ्यासाचा हवाला देत इकॉनॉमिक टाइम्सने भारतातील सर्वोच्च ऑटोमोबाईल कंपन्यांमधील महिला अधिकाऱ्यांची स्थिती सांगितली आहे.

अहवालानुसार, भारतातील 11 मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे आणि त्यांचा वाटा 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

तसेच महिलांना पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कमी मोबदला दिला जातो. अभ्यासानुसार, टॉप ऑटो कंपन्यांमधील महिलांचा पगार पुरुषांच्या तुलनेत 11 टक्के कमी आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन द्वारे केलेल्या अभ्यासात दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू येथे झालेल्या 16 बैठकांमध्ये 130 उद्योग प्रतिनिधींचा समावेश होता.

या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (सीईओ) 54 टक्के महिला आणि 46 टक्के पुरुष होते. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले. त्या म्हणाल्या की या अभ्यासाने कंपन्यांमधील लैंगिक असमानत आणि करिअर संधींवर प्रकाश टाकला आहे.

नेक्स्ट 500 लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत हा आकडा पाच टक्के आहे आणि फॉर्च्यून इंडिया 1000 कंपन्यांच्या बाबतीत हा आकडा 3.2 टक्के आहे.

फॉर्च्यून इंडिया कंपन्यांच्या कमाईवर आधारित भारतातील सर्वोच्च 500 कंपन्यांची वार्षिक यादी प्रकाशित करते. नेक्स्ट 500 लिस्टमध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कमाईच्या बाबतीत टॉप 500 मध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत.

अहवालातून समोर आलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 30-40 टक्के महिला कर्मचारी मध्यम व्यवस्थापन स्तरावर पोहोचल्यानंतर नोकरी सोडतात. या वेळेपर्यंत ते सहसा विवाहित असतात आणि त्यांचे कुटुंब असते आणि एक मूल झाल्यानंतर कामावर परतणे त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक होते.

दोन दिवसांनी महिला दिन येत असताना हा अहवाल आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असतानाही टॉप ऑटो कंपन्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा वाटा नगण्य आहे.

अभ्यासात समाविष्ट असलेल्या वाहन कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे आणि त्यांचा भारतीय वाहन बाजारपेठेत 85 टक्के वाटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT