Raghuram Rajan Sakal
Personal Finance

''रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली अन् काँग्रेसने भ्रष्टाचाराचे दुकान चालवले''

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा चांगलाच समाचार घेतला.

राहुल शेळके

Raghuram Rajan: केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, राजन यांनी आरबीआय गव्हर्नर पदावर असताना संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली होती. राजन अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात.

अलीकडेच त्यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएलआय योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका रिसर्च नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ही योजना अपयशी होणार आहे.

उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने विविध क्षेत्रांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही राजन सहभागी झाले होते. त्यादरम्यान, राहुल गांधी यांच्या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पाच टक्के जीडीपी वाढला तर भारत भाग्यवान असेल.

अलीकडील आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशाचा GDP वाढ 7.2 टक्के होता. तेव्हापासून रघुराम राजन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चंद्रशेखर म्हणाले, ''त्यांना ठरवू द्या की ते अपयशी राजकारणी आहेत की अपयशी अर्थतज्ज्ञ? भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र उद्ध्वस्त केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.''

(Raghuram Rajan wrecked entire banking system as RBI governor says Rajeev Chandrasekhar)

केंद्रीय मंत्री म्हणाले की काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने 10 वर्षे भ्रष्टाचाराचे दुकान चालवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' या घोषणेची खिल्ली उडवताना चंद्रशेखर यांनी त्यांना परदेशी पर्यटक असे संबोधले.

भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणाले, “तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने 2004 ते 2014 या कालावधीत पाहिले तर सर्वात योग्य वर्णन म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान असे करता येईल.

हा तो काळ होता जेव्हा 2G घोटाळा झाला, Antrix-Devas घोटाळा झाला, गुंतवणूकदार भारत सोडून जात होते आणि BSNL पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.''

पुढे ते म्हणाले की, "यूपीएचे 2004-2014 हे दशक वाया गेले आहे आणि पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून सुरू झालेले दशक हे भारताच्या टेक्नोक्रॅट्सचे दशक आहे. भारत आज जगातील सर्वात वेगवान 5G चा साक्षीदार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT