RBI  Sakal
Personal Finance

RBI Penalty: आरबीआयने चार सहकारी बँकांना ठोठावला दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Penalty: आरबीआयने बँकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत

राहुल शेळके

RBI Penalty: आरबीआयने चार बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, तपासादरम्यान या बँकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने सहकारी बँका असलेल्या या चार बँकांची नावे जाहीर केली आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ज्या बँकांवर दंड ठोठावण्यात आला आहे त्यात बारामती सहकारी बँक, बेचराजी नागरिक सहकारी बँक, वाघोडिया अर्बन सहकारी बँक आणि विरमगाम मर्कंटाइल सहकारी बँक यांचा समावेश आहे.

कोणत्या बँकेला किती दंड?

बारामती सहकारी बँकेला 2 लाख आणि बेचराजी नागरीक सहकारी बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. याशिवाय वाघोडिया अर्बन सहकारी बँकेला 5 लाख आणि विरमगाम मर्कंटाइल सहकारी बँकेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत

रिझर्व्ह बँकेने या सर्व बँकांना वेगवेगळ्या कारणांसाठी दंड ठोठावला असून सर्व बँकांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी नियमांचे पालन न केल्यास, दंड आणि निर्बंध लादले जाऊ शकतात.

सायबर सुरक्षेचा प्रश्न

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने सायबर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणखी एका बँकेला दंड ठोठावला होता. एपी महेश सहकारी बँकेला 65 लाखांचा दंड ठोठावला आहे. हॅकर्सनी या बँकांमध्ये घुसून 12.48 कोटी रुपयांची चोरी केली होती.

ग्राहकांवर काय परिणाम होईल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या बँकांवर दंड आकारला जातो. तो फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT