bhishma.j
bhishma.j 
सप्तरंग

एक सिद्धांत असाही

डॉ. मृणालिनी नाईक

आपण भीष्म पितामहांची गोष्ट सुरू केलीच म्हणून एक साधा सहसा बोलला न जाणारा सिद्धांत आठवला. खूप काही मोठं वाटेल असा नाहीये, पण सहसा आपली पत कुठेही (फक्त ऑफिसच नाही तर पूर्ण आयुष्य) राखून ठेवता येईल असा नक्कीच आहे.

त्यासाठी आपण पुन्हा कहाणीपासूनच सुरू करूया. भीष्मांचा अंत कसा झाला हे आपल्यापैकी जवळपास बहुतेकांना माहीत आहेच. शिखंडीला ढाल म्हणून वापरून अर्जुनाने भीष्मांवर बाण सोडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर छिन्न-विछिन्न केले. शिखंडी, म्हणजेच अंबा नावाच्या एका राजकन्येचा पुनर्जन्म आणि हेच भीष्मांच्या पतनाचे कारण होते हेही आपल्याला माहीत आहे. ही अंबा का म्हणून भीष्मांच्या पतनाला इतकी आतुर होती की तिने पुन्हा जन्म घेतला फक्त भीष्मांचा अंत व्हावा म्हणून. आणि भीष्माला इच्छा मृत्यू प्राप्त असूनही भीष्माने का म्हणून ते होऊ दिले.
जास्त खोलात न जाता फक्त इतकेच इथे महत्त्वाचे की, महाभारत ही कहाणी कितीतरी लोकांच्या मानापमानाची आणि त्यासाठी पेटलेल्या सुडाची आहे. असो, इथे सांगायची बाब म्हणजे व्यक्ती कोणत्याही पदावर का असेना, पण त्याच्या हातून कितीतरी चुका होत असतात. खरंतर या चुका आपण करतो आहोत हे बहुदा त्या व्यक्तीला ठाऊक असते, पण भीष्मांनी त्यांच्या नातेवाइकांसाठी साम, दाम, दंड, भेद, सगळं काही केले. पण, त्या सगळं काही करण्यामध्ये कितीतरी चुका त्यांच्याही हातून घडल्या. तशीच एक चूक अंबाच्या बाबतीतलिही आणि असे म्हणतात की महादेवाने अंबाला वरदान दिले की ती भीष्मांच्या मृत्यूचे कारण बनेल आणि शिखंडीच्या रूपात ते घडलं.
आपण भीष्म नसलो तरीही आपल्या हातून कळत नकळत कितीतरी चुका होत असतात. याचे बहुदा मुख्य कारण असते आपली पोझिशन, हातात असलेली सत्ता. कोणत्याही टप्प्यावरची का असे ना? पाहा आता विचार करून, बहुदा सत्ता मग ती घरातली असो वा ऑफिसची काही विविध प्रकारचे मुद्दे घेऊन येते. सत्तेत असताना कितीदा तरी एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहिती असूनही आपण त्याकडे सहज कानाडोळा करतो आणि मागे ओढवत असतो तो रोष. आपल्या हातून कोणाची मने दुखावली तर जात नाहीये ना, याचा आपण विचार करत नाही.

प्रत्येक पदाचा एक जसा मान असतो तसाच त्या पदाच्या काही सीमाही असतात. या सीमा आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे असते. तेव्हा आपली सत्ता किंवा पद याच्या अंतर्गत आपल्याला काय करायला हवं हे आपण जसे ठरवायचे असते तसेच काय करू नये हेही आपणच ठरवायचे असते. सहसा काही गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक असुरक्षिततेच्या भावनेपोटी घडतात. या व्यतिरिक्त जर काही आहे तर मग कोणासाठी किती आणि कोणत्या शिखरापर्यंत आपण जाऊ शकतो किंवा जायला हवे हे आपल्या ठरवण्यावर आहे. तेव्हा मी माझ्यासाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी हे केलेले नसून अमक्‍यासाठी हे आणि तमक्‍यासाठी ते केले असे व्हायला नको. कारण चूक कोणाहीसाठी केली असली तरी ती चूक आहे आणि त्याचे परिणाम आज ना उद्या भोगायला लागतात.

आपल्याला हे ठाऊक आहे की प्रत्येकाला त्याचा मान आणि अपमान हे सहज कळतात मग तो कोणत्याही दर्जाचा असो. पाहा ना, भीष्माने स्वतःसाठी राजकन्येचे अपहरण केले नसलं तरीही तिचा अपमान आणि तिच्यावरच्या अन्यायाचं कारण मात्र तोच होता. तेव्हा कालांतराने त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले. तेव्हा सांगायचं तात्पर्य असे की, एकदा का आपल्या सीमा आपण सांभाळल्या तर पुढे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ टाळता येते. या सीमा, वय, शब्द, कर्म, वागणूक, नियम इत्यादी कशाच्याही असू शकतात. तेव्हा एकदा का व्यवस्थापन करताना याचे महत्त्व कळले तर घर आणि ऑफिस दोन्हीमध्ये कितीतरी चुका सहज टाळता येणे शक्‍य आहे. लिखित नियम नसला तरी अलिखित सत्य हेच की मानापमानाच्या कचाट्यातून बाहेर तेव्हाच पडता येते जेव्हा स्वतःच्या सीमा आपण जाणून असतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT