Beauty
Beauty 
सप्तरंग

सौंदर्य आणि निरागसता !

श्री श्री रविशंकर

चेतना तरंग
समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात. त्यापैकी काही समुद्राच्या मध्यभागीच नष्ट होतात. त्या किनाऱ्यापर्यंत पोचू शकत नाहीत. पाठीमागील लाटांकडून त्या ओढल्या जातात. सौंदर्याची मोठी लाट फक्त निरागसतेतून निर्माण होऊ शकते. तुम्ही कधी याचे निरीक्षण केलेय का? सौंदर्याची लाट अशा प्रकारे निरागसतेतून निर्माण झाली नाही, तर ते सौंदर्य अधिक काळ टिकू शकत नाही. मालकीहक्काची भावना निर्माण झाली की, कुरूपता जन्मते. सौंदर्याची शुद्धता निरागसतेमध्ये असते. तुम्ही पौर्णिमेचा चंद्र, एखादे रंगबिरंगी दृश्‍य किंवा धबधबा पाहता तेव्हा ‘वा...काय सुंदर..’ असे उद्‌गार आपोआपच काढता. या वेळी, सौंदर्याची वेगळ्या प्रकारची भावना असते. तुम्हाला यापेक्षा एखादी छोटी वस्तू आपल्या मालकीची होईल किंवा आपण ती नियंत्रित करू शकू, असे वाटते. मग तो मित्र, रंग यापैकी काहीही असेल. तुमचे मन ती आपल्याकडे हवीच, असे म्हणते. आता या प्रकारच्या सौंदर्यात एक प्रकारची व्याकुळता आहे. अशा वेळी निरागसता संपते आणि सौंदर्यही फार काळ टिकू शकत नाही. सौंदर्याच्या लाटा निर्माण होतीलही, मात्र त्या लवकरच तरंग मिटल्याप्रमाणे संपतील. तुम्ही सौंदर्याचा आस्वाद घेता तेव्हा पूर्णपणे उत्साही असता. तुम्हाला अजिबात थकवा जाणवत नाही. एखाद्याला थकवा, सुस्तपणा जाणवतो, तेव्हा तो अतिशय सुंदर गोष्टीचाही आनंद घेऊ शकत नाही. खरं तर, उत्साह, शांतता, निरागसता यांच्या मिश्रणातून सौंदर्याच्या लाटा निर्माण होतात. कोणत्याही देशातील मुले इतकी सुंदर का वाटतात?

पृथ्वीवरील कुठलीही मुले एखाद्या फुलासारखी ताजीतवानी, टवटवीत दिसतात, कारण त्यांचे मन स्फटिकासारखे स्वच्छ असते. मुलांमध्ये निरागसता असते. निरागसतेतून उमलणारे हास्य प्रत्येक जण स्वीकारतो. त्यामध्ये सौंदर्य असते. निरागसतेतून केले जाणारे वक्तव्य किंवा अगदी टीकाही केवळ कंठातून केली जाते. ती त्यापेक्षा अधिक खोलवरून केली जाऊ शकत नाही. तेच निरागसतेचे सौंदर्य असते. तुम्ही निरागस कसे होऊ शकाल? तुम्ही स्वतःच्याच अंतरंगात डोकवाल, तेव्हा निरागस व्हाल. एखादी व्यक्ती खूप तणावात असते तेव्हा तुम्ही तिच्याशी सौंदर्य, उच्च मूल्यांच्या भाषेत बोलू शकत नाही. तुम्ही सर्वप्रथम शांती, शिथिलीकरण आणि अंतर्मुख होण्याबद्दल बोलले पाहिजे. सौंदर्यात संपूर्ण जोम, उत्साहाची निरागसता असते. अशा शुद्ध ऊर्जेतूनच तुमच्यातील चैतन्याला बहर येऊ शकतो. त्यानंतर, तुम्हीच निरागसतेची पहाट अनुभवाल. संपूर्ण निर्मिती निरागस शिव तत्त्वातून झालीये. तुम्ही हे ओळखून त्याप्रमाणे निरागस होत नाही, तोपर्यंत या साम्राज्यात शिरकाव करू शकत नाही. तुमचे स्वतःचे विचार या मार्गात अडथळा निर्माण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT