Ashoka Pillar at Lumbini, birthplace of Lord Buddha. Photograph from 1956.
Ashoka Pillar at Lumbini, birthplace of Lord Buddha. Photograph from 1956. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : नेपाळ राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

राजवंश ‘भारती’मध्ये नेपाळच्या राजवंशाची माहिती कशासाठी? हा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. त्यासाठी आधीच हे स्पष्ट करणं आवश्यक आहे, की नेपाळ हा देश म्हणून इ.स. १७६८ मधे अस्तित्वात आला. प्राचीन काळी तो बृहधा भारताचाच एक प्रदेश होता. रामायण काळात सीतेचे माहेर असलेली मिथिला नगरी म्हणजे आजचे नेपाळमधील जनकपूर, असा एक दावा आहे. गौतम बुद्धांची जन्मभूमी लुंबिनी तर नेपाळमध्ये आहेच. त्यामुळे नेपाळचा प्राचीन इतिहास हा शेवटी भारताचाच इतिहास आहे. (nashik saptarang latest article rajvansh bharati marathi news)

‘गोपाल राजवंशावली’ या भूर्जग्रंथाची पाने.

काश्मीरच्या राजवंशाची माहिती देणारा ‘राजतरंगिणी’ हा जसा प्राचीन ग्रंथ आहे, तसाच नेपाळच्या राजवंशाची माहिती देणाराही एक जुना ग्रंथ आहे - ‘गोपालराजवंशावली’. ब्रिटिशांच्या राजवटीत प्रो. सेसिल बेंडॉल या संशोधकाला १८९९ मध्ये काठमांडूच्या शाही ग्रंथालयात एक भूर्जपत्रांचा हस्तलिखित ग्रंथ सापडला.

त्यात नेपाळच्या प्राचीन राजघराण्यांची यादी आणि संक्षिप्त माहिती दिलेली होती. त्यात पहिला राजवंश ‘गोपाल’ हा होता. त्यामुळे या ग्रंथाला ‘गोपालराजवंशावली’ हे नाव रूढ झाले. हे मूळ हस्तलिखित ४८ भूर्जपत्रांचे आहे. ते पृष्ठ क्रमांक १७ पासून उपलब्ध आहे. म्हणजेच त्याची पहिली १६ पाने गायब झाली (केली?) आहेत.

डॉ. जॉर्ज बुहलरसारखे पाश्चात्त्य आणि श्री कमलप्रकाश मल्लासारखे अर्वाचिन संशोधक या ग्रंथातील निवडक भाग उचलून तेवढाच इतिहास मानतात. त्यामुळे त्यांच्या मते ही राजांची यादी नेपाळ संवत् १७७ ( इ.स. १०५७) पासून सुरू होते. त्या आधी चे सर्व काल्पनिक! पण, श्री.कोटा वेंकटाचलम् या तेलुगू विद्वानाने अनेक वर्षांच्या अभ्यासांती ‘राजतरंगिणी’ आणि ‘गोपाल राजवंशावली’ या दोन्ही ग्रंथात नमूद राजांची पुनर्लिखित साधार यादी तयार केली. (Latest Marathi News)

या यादीनुसार नेपाळ चा राजवंश थोडक्यात असा आहे -

१) गोपाल राजवंश : हा वंश इसवी सनापूर्वी ४१५९ मध्ये, महाभारत युद्धाच्या सुमारे हजार वर्षे आधी सुरू होतो, असे म्हटले आहे. याचा पहिला राजा 'मुक्तमानगुप्त' हा होता. या वंशाचे ८ राजे होऊन गेले. त्यांची सत्ता एकूण सुमारे ५०० वर्षे होती. शेवटला राजा यक्षगुप्त.

२) अहिर वंश : यालाच महिषपाल वंश ही म्हटले आहे. याच्या केवळ तीन पिढ्या झाल्या .. वरसिंह, जयमतसिंह आणि भुवनसिंह. त्यांनी अंदाजे २०० वर्षे राज्य केले. राजाच्या नावापुढे 'सिंह' ही उपाधी लावण्याची पद्धत या वंशाने प्रथम सुरू केली असे म्हणतात. अर्थात याचा स्पष्ट पुरावा नाही.

३) किरात वंश : 'यलांबर' नावाच्या राजापासून किरात वंश सुरू झाला. त्यातील २९ राजांनी एकूण ११०० वर्षे राज्य केले. 'गस्ती' हा किरात वंशातील अखेरचा राजा होता. द्युमती हा किरात राजा पांडवांना समकालीन होता.

३) सोमवंश : निमिष राजा पासून सोमवंशाची सत्ता सुरू झाली, ती भास्करवर्मन पर्यंत. भास्करवर्मन फार पराक्रमी होता. त्याने आपले राज्य बरेच विस्तारले. त्याला मूल नसल्याने त्याने भूमिवर्मन याला दत्तक घेतले. हा वंश सुमारे ६०० वर्षे गादीवर होता. नेपाळमधे जनश्रद्धा अशी आहे की काठमांडू मधील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची मूळ स्थापना सोमवंशाच्या राजवटीत झाली आहे. कालौघात ते वेळोवेळी पडले आणि पुन्हा नव्याने बांधले गेले, तो भाग वेगळा!

४) सूर्यवंश : भूमिवर्मन हा सूर्यवंशी राजा म्हणून गादीवर बसला. त्याच्यापासून सूर्यवंशाची राजवट सुरू झाली. हा वंश प्रदीर्घ काळ- इ.स. पूर्व १७११-१२ ते इ.स. पूर्व १०१, अशी १६१० वर्षे सत्तेवर होता. त्या काळात सुमारे ३० राजे होऊन गेले. अखेरचा विश्वदेववर्मन. (Latest Marathi News)

५) ठाकुरी वंश : विश्वदेववर्मनाचा जावई अंशुवर्मन 'ठाकुरी' वंशाचा होता. तो राजा झाला आणि ठाकुरी वंशाची सत्ता आली. याच अंशुवर्मन च्या कारकीर्दीत उज्जैनीचा प्रतापी सम्राट विक्रमादित्य नेपाळमधे येऊन गेला. त्याने 'शकारि' ही पदवी धारण करून इ.स. पूर्व ५७ मध्ये 'विक्रम संवत्' या कालगणनेला सुरवात केली.

नेपाळ मधे आजही विक्रम संवत् ही नेपाळ शासनाची अधिकृत दिनदर्शिका आहे. ठाकुरी वंशाच्या राजवटीत मध्यंतरी काही काळ लिच्छवी गणराज्याची सत्ता नेपाळ मधे होती. नंतर राजा राघवदेवाने पुन्हा ठाकुरी वंश सत्तेवर आणला. त्याने इ.स. ८७९-८० मधे स्वतंत्र "नेपाळ संवत" सुरू केला. अनेक राजांच्यानंतर विजयकामदेव हा या वंशाचा शेवटचा राजा झाला.

६) मल्ल वंश : ठाकुरी वंशाच्या पतनानंतर इ.स.१२०१ मधे अरिदेव मल्ल याने मल्ल वंशाची राजवट सुरू केली. या राजवटीत नेपाळ सर्व आघाड्यांवर सुस्थितीत होते. 'मैथिली' भाषा आणि 'नेवारी' लिपी याच काळात बहरली. या वंशाचा राजा 'जयस्थिती मल्ल' याच्या कारकीर्दीत, बहुधा इ.स. १३९० च्या सुमारास, 'गोपाल राजवंशावली' हा ग्रंथ लिहिला गेला. त्यामुळे तिथवरच्या नोंदी या वंशावळीत आहेत. या ग्रंथाचा काही भाग संस्कृत मधे तर काही नेवारी लिपीत आहे. जयस्थितीमल्ला नंतर मल्ल वंशाला उतरती कळा लागली. राज्य चार भागांमधे विभागले गेले.

७) गुरखा / गोरखा वंश : नेपाळमधे १५-१६ वे शतक हा राजकीय धामधुमीचा काळ होता. लहान मोठ्या राजवटी ठिकठिकाणी राज्य करीत होत्या. दुसरीकडे इस्लामी आक्रमकांचे हल्ले सुरू झाले होते. अशा वातावरणात इ.स. १५५९ मधे गुरखा राजकुमार द्रव्य शाह याने अशाच काही राजवटी ताब्यात घेऊन 'शाह' अथवा 'गुरखा राजवंश' स्थापन केला. याच वंशातील १० वा राजा पृथ्वी नारायण शाह हा १७४३ साली गादीवर आला.

त्याने मल्ल राजवटीच्या अखेरच्या शासकांना पराजित करून, जवळ जवळ सगळा नेपाळ एकत्र करूनआपल्या आधिपत्याखाली आणला. सन १७६८ मधे त्याने नेपाळ हे स्वतंत्र राज्य अथवा देश म्हणून; आणि स्वतः:ला त्या राज्याचा राजा म्हणून घोषित केले. इथपासून नेपाळ हा भारतवर्षाचा एक प्रदेश न राहता तो एक स्वतंत्र देश झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT