Children Playing
Children Playing esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : उन्हाळ्याच्या सुट्या आणि बालसंस्कार शिबिरे

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

शालेय मुला-मुलींच्या उन्हाळ्याच्या सुट्या (Summer Vacations) सध्या सुरू आहेत. आणखी पंधरा दिवसांनंतर ही मुलं पुन्हा एकदा शाळेच्या रगाड्यात व्यस्त होतील. बालसंस्कार शिबिरांची (Chilld Culturing Camps) मोठी लाट काही वर्षांत होती. सध्यादेखील अशी शिबिरं होतात, पण त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. मुलांना मिळालेल्या सुट्यांमध्ये शहराबाहेर, राज्याबाहेर फिरायला जाण्याचा एक प्रघात पडला आहे. त्यामुळे साधारण दीड महिन्याच्या सुटीतील १५ दिवस फिरण्यात जातात. उरलेल्या साधारण महिनाभराच्या कालावधीत मुलांना कोणत्या शिबिरांना पाठवायचं हे ठरवताना पाच-सहा दिवस निघून जातात. अनेक शिबिरांच्या तारखा जुळत नाहीत वगैरे अशा एक ना अनेक कारणांमुळे अशा शिबिरांत मुलांना सहभागी होता येत नाही. शिवाय हल्ली होणारी बालसंस्कार शिबिरंदेखील कोणत्या प्रकारांतील आणि दर्जाची आहेत, हादेखील एक स्वतंत्र शोधाचा विषय आहे. (Summer vacations and child culturing camps Saptarang Marathi Article Nashik News)


बालवयात होणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हल्लीच्या पिढीला या संस्कारांची अधिक गरज आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे हा एक विषय घेतला, तरीदेखील आत्मविश्वास वाढायला हवा म्हणजे तो नेमका कसा वाढवता येईल, याची कोणतीही विशिष्ट थिअरी नाही. आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रत्यक्ष पोहणं शिकणे, घोडेस्वारी करणं, गिर्यारोहणाचे धडे गिरवणं वगैरे गोष्टी शिकून त्या आत्मसात करायला हव्यात. त्यातून आत्मविश्वास काय असतो हे समजावून सांगण्याची गरज उरणार नाही. तर आत्मविश्वास, साहस हे गुण आपोआप मुलांमध्ये निर्माण होतील, असे प्रत्येक गुणाबाबत आहे. विशिष्ट गुण निर्माण हहोण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्याची मुलांची आणि खासकरून पालकांचीही तयारी नाही. अगदी २००५ पर्यंत वैगरे शालेय मुलांकडे थोडा मोकळा वेळ असायचा. मोबाईलचं व्यसन शालेय मुलांना नव्हतं. त्यामुळे वेळ मिळाला, की मैदानी खेळांशिवाय अन्य कुठला मार्ग त्यांच्यासमोर नसायचा.

मैदानी खेळांमध्ये मुलं रमली की त्यांच्यात अनाहूतपणे अनेक गुण विकसित व्हायचे. पण ही प्रक्रिया मोबाईलच्या जंजाळामुळे सध्या कमालीची मंदावली आहे. अलीकडेच दक्षिण कोरियातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात जे खेळ गेल्या पिढीतली मुलं खेळायची, म्हणजे लंगोरी, लंगडी, सूरपारंब्या, विटी-दांडू वगैरे. कोरियन मुलं हे खेळ खेळताना व्हिडिओत दिसत आहेत, तर आपल्याकडची मुले मोबाईल गेम खेळण्यात गुंतलेली यात दिसतात. हा व्हिडिओ प्रातिनिधिक असला तरीदेखील त्यातून बोध घेण्यासारखं बरंच काही आहे.
हल्लीच्या पिढीला कुटुंबातील सदस्यांबद्दल प्रेम, आपुलकी, आत्मियता समजावून सांगण्याची जबाबदारी वडीलधाऱ्या मंडळींची आहे. मामा-आत्या यांच्यापलीकडेही अजून कुठले नातेवाईक असतात, हे या मुलांना माहीत नाही. कुटुंबांमधला संवाद मोबाईलने संपुष्टात आणल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम सध्याच्या पिढीवर दिसत आहेत.

आत्मकेंद्री आणि आत्मप्रौढी मिळविण्यात धन्यता मानणारी पिढी तयार होतेय. भारतीय कुटुंब व्यवस्थेवरील हा मोठा आघात ठरतोय. प्रेम, जिव्हाळा हे गुण विकसित करायचे असतील, तर माणसांसोबतच निसर्ग आणि पशु-पक्ष्यांमध्ये संवाद असू शकतो, तो प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यातून हे गुण मुलांमध्ये हळूहळू विकसित होतील. मनसोक्तपणे या गोष्टी करण्याची प्रमुख वेळ म्हणजे उन्हाळी सुट्या. भारतीय मूल्य, परंपरा आणि संस्कार ही मोठी देणं आपल्याकडे आहे. ही पुढच्या पिढीला देण्याची जबाबदारी समाजातील ज्येष्ठांना स्वीकारावी लागेल.

आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात शिक्षण घेत राहायचं हा मूल्यसंस्कार शालेय वयात बिंबायला हवा. अनेक गोष्टी अनुभवातून, संवादातून शिकता येतात. त्यासाठी संवादाची साखळी तुटता कामा नये. हल्ली कुटुंबातील प्रत्येक जण त्याची ‘स्पेस’घेत कमालीचा व्यस्त झाला आहे. कुटुंबात संवाद तुटत असेल, तर समाजात संवाद कसा प्रस्थापित होईल? समाज आणि देश तर नंतरचा मुद्दा ठरतो. आधी कुटुंबातील तुटत चाललेल्या संवादासाठी या सुट्यांचा यथायोग्य उपयोग करता आला, तर हा वेळ कारणी लागेल. अनेक अशा गोष्टी असतात, ज्या प्रत्यक्ष शिकवण्याची गरज नसते. निरीक्षणातून मुलं या बाबी शिकत जातात. सोशल मीडिया, मोबाईल आणि सगळीच ‘डिव्हायसेस’ बाजूला सारून प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष संस्कारातून या पिढीला फायदा झाला, तर ते या सुट्यांचं फलीत ठरेल किंबहुना पुढच्या सुट्यांसाठीची ही पायाभरणी ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT