Rain esakal
सातारा

पीक नुकसानीची भरपाई द्या; 'बळीराजा'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगडे, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तत्काळ पंचनामे करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारतर्फे मदत जाहीर करावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली आहे.

कोरोना काळात प्रशासन महामारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, कोरोनाचे संकट काही दूर होताना दिसत नाही. आज सर्वसामान्य जनता, शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कधी निसर्गनिर्मित संकटे, तर कधी मानवनिर्मित संकटे यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष बागा, टोमॅटो, कलिंगड, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यातच कोरोनामुळे शेतीमालाला, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना, फळांना मागणी नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जे विकतेय तेही पावसात वाया जात आहे. त्यामुळे निसर्गनिर्मित संकटामुळे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. रात्रं-दिवस शेतामध्ये काबाडकष्ट करून शेतकरी जमिनीत सोनं पिकवतो. मात्र, अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या अस्मानी संकट काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे, पडलेल्या घरांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही आवाहन श्री. मुल्ला यांनी केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahaparinirvan Din: महासूर्याच्या चितेला साक्षी ठेवून अनुयायांची धम्मदीक्षा; आंबेडकरांनी १६ डिसेंबर १९५६ ला मुंबईत कोणता संकल्प केला?

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाणदिनानिम्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान? योगींनी शेअर केला खास video

Indigo Flight रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पूर्ण पैसे परत मिळतील का? विमान कंपन्यांचे नियम काय सांगतात?

NZ vs WI 1st Test : भले शाब्बास... Justin Greaves च्या द्विशतकाने विंडीजला वाचवले, विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या न्यूझीलंडला रडवले

'बोलविता धनी': हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितिज दाते सज्ज!

SCROLL FOR NEXT