सातारा

केस तर केस आम्ही करणार बिझनेस; साताऱ्याच्या व्यापाऱ्यांची मानसिकता

सचिन शिंदे

सातारा : कोरोना महामारी सुरु झाल्यापासून तीन महिने लॉकडाउन सुरु होता. सर्वकाही बंद असल्याने अनेकांवर  उपासमारीची वेळ आली होती. कोरोनापासून बचावासाठी लॉकडाउन हा उपाय नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने १७ ते २६ जुलै असा १० दिवसांचा लॉकडाउन पुन्हा ठेवला होता. त्यास आम्ही सहकार्य केले मात्र आता आमच्यासह कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून उद्यापासून (बुधवार) व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सातारा शहरातील विविध दुकानदारांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली. दरम्यान जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनच्या काळात सर्व दुकाने सुरु ठेवण्यास संमती द्यावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हीच ती वेळ

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिल्यानंतर व्यावसायिकांच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधताना काेराेनाला राेखण्यासाठी लाॅकडाउन हा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाॅकडाउनमुळे अर्थकारण ठप्प झाले आहे. कामगार वर्गाचे कुटुंब चालविणे ही मालकाची जबाबदारी असते. त्यामुळे व्यापारी दुहेरी संकटात सापडले आहेत. रविवारी (ता.26) जाहीर केलेल्या पुनश्च लाॅकडाउनमध्ये सर्व मार्केट खूले करण्याची परवानगी नाही. जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केल्याचे जयेंद्र चव्हाण, सुदीप भट्टड, प्रशांत माेदी आदींनी सांगितले. यावेळी सुशांत नावंधर, विजय येवले यांच्यासह राजपथ आणि पाेवई नाका येथील व्यापारी उपस्थित हाेते. दरम्यान जिल्हा प्रशासनाने 31 जूलैपर्यंत सहकार्य करावे असे आम्हांला सांगितले आहे. मात्र आम्ही दुकान सुरु करण्याच्या मानसिकतेत आहाेत. आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल अशी भुमिका व्यापारी वर्गाने घेतली. याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी आज (साेमवार) सायंकाळी पाच वाजता व्यापारी वर्गाची बैठक हाेणार आहे.

उदयनराजेंनी जिल्हाधिकारी सिंह यांच्याशी तासभर केली चर्चा

Video : व्यापाऱ्यांची 'ही' मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार : पृथ्वीराज चव्हाण

या पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे

दरम्यान कोरोनाला रोखण्याबरोबरच जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी सर्व दुकाने सुरु असणे अत्यावश्यक आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे बाजारपेठेची, व्यापार्‍यांची, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. या लॉकडाऊनमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशी वेळेची शिथिलता देवून सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. तरच नागरिकांना, व्यापार्‍यांना आणि खास करुन शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. गर्दी टाळण्यासाठी आणि जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रशासनास दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT