Ganeshotsav Shambhuraj Desai esakal
सातारा

Shambhuraj Desai : गणेशोत्सवाबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांना दिले महत्त्वाचे आदेश; देसाई म्हणाले, गालबोट लागेल असं..

गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त राहावा.

सकाळ डिजिटल टीम

यंदाही गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अतिशय चांगल्या पद्धतीने व समन्वयाने साजरे करण्यात येतील.

सातारा : जिल्ह्याला शांततेची परंपरा असून, यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) सर्वांनी मिळून संयम व शांततेने आनंदात पार पाडा. प्रशासन व नागरिकांत समन्वय राहण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना समजून घेण्याची, सामंजस्याची भूमिका ठेवावी, असं आवाहन शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले.

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात व कोणतेही गालबोट न लावता पार पाडूया, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा प्रशासन व पोलिस दलासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.

या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, ठाणे अंमलदार, पोलिस निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘लोकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणांनी नागरिकांशी सामंजस्याची भूमिका ठेवावी. जाणीवपूर्वक कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशांसाठी आपले अधिकार वापरावेत. ज्या ठिकाणी उत्सव काळात गर्दी होते, अशा ठिकाणी महिला, मुलींची विशेष काळजी घ्यावी. विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी यंत्रणांवर ताण येतो. या ठिकाणी सतर्क राहावे. मोठ्या आवाजाचे ध्वनिक्षेपक लावताना आवाजाची मर्यादा कोणी ओलांडू नये.’’

जितेंद्र डुडी म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीतील सदस्यांबरोबर यंत्रणांनी सातत्याने समन्वय ठेवावा. पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी यांच्याकडून सातत्याने माहिती घ्यावी. रोज बैठक घ्यावी. यंत्रणांनी कोणत्याही घटनेपासून अनभिज्ञ राहू नये.’’

समीर शेख म्हणाले, ‘‘गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त राहावा, यासाठी पोलिस आणि होमगार्ड यंत्रणा तैनात करण्यात येत आहे. गर्दीमुळे एखादी आपत्ती ओढवल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी दळणवळण यंत्रणांशीही समन्वय ठेवण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांना आचारसंहिता देण्यात आली आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल कार्यरत करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे गणेशोत्सव जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा झाला असून, यंदाही गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अतिशय चांगल्या पद्धतीने व समन्वयाने साजरे करण्यात येतील.’’

तेढ निर्माण होणारे देखावे नकोत

यंदा जवळपास पाच हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती बसविणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. गणेशोत्सव मंडळांना आचारसंहिता देण्यात आली असून, समाजात तेढ निर्माण होणारे देखावे उभे करू नयेत, असे आवाहन करून समीर शेख म्हणाले, ‘‘यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल कार्यरत करण्यात आला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics News: राहुल गांधींना मोठा धक्का! काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गज नेत्याचा पक्षाला रामराम; मनधरणीचा प्रयत्न होणार?

Mastani Descendants : मस्तानीचे वंशज आता कुठे आहेत? काय आहे त्यांची सध्याची अवस्था..पाहा इतिहासात खोल दडलेलं रहस्य

Ratha Saptami 2026: कुंडलीत सूर्यदोष आहे? तर रथ सप्तमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकवू नका!

Gold and Silver Price : सोन्या-चांदीची ऐतिहासिक भरारी! सोन्याने गाठला दीड लाखाचा टप्पा, तर चांदी ३ लाखांच्या पार

T20 World Cup: बांगलादेशचा पत्ता कट झालाच! वर्ल्डकपमध्ये भारतात त्यांच्या जागी हा संघ खेळणार, ICC कडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT