Congress-NCP esakal
सातारा

आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकऱ्यांनी घेतला नाही

वाईच्या लोकप्रतिनिधींचे साटेलोटे बंद करा : जिल्हाध्यक्ष विराज शिंदे

उमेश बांबरे

सातारा : किसन वीर कारखान्याकडे (Kisan Veer Sugar Factory) थकीत असलेली यावर्षीची ऊसबिले येत्या २९ तारखेपर्यंत सभासदांच्या खात्यावर कारखाना व्यवस्थापनाने जमा करावीत, अन्यथा ३० ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या वतीने किसन वीर आबांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्यासमोर कारखाना व्यवस्थापनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे (Congress District President Viraj Shinde) यांनी दिली. दरम्यान, वाई तालुक्यातील (Wai taluka) लोकप्रतिनिधींचे आमदारकी व कारखान्यासाठी असलेले साटेलोटे आता बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहे.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विराज शिंदे यांनी किसन वीर कारखान्याच्या सभासदांसाठी काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘किसन वीर साखर कारखान्याकडे असलेली यावर्षीची प्रलंबित ऊसबिले येत्या २९ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, तसेच कामगारांची थकीत देणीही द्यावीत. अन्यथा ३० ऑगस्टला किसन वीर आबांच्या जयंती दिनी त्यांच्या कारखान्यावरील पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव सहभागी होणार आहेत.’’

आमदार मकरंद पाटलांवर (MLA Makarand Patil) टीका करताना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी विद्यमान आमदारांनी कधीच लढा उभारला नाही. केवळ आपली आमदारकी टिकविण्यासाठी सभासदांचे प्रश्न उपस्थित न करता कारखान्याच्या नादी लागायचे नाही, हेच आजपर्यंत पाहायला मिळाले. हे आता सभासद व शेतकरी खपवून घेणार नाहीत. त्यांची आमदारकी टिकविण्याचा ठेका शेतकरी व सभासदांनी घेतलेला नाही. आमदारकी व कारखान्यावरून वाई तालुक्यातील दोन लोकप्रतिनिधींत असलेले साटेलोटे बंद झाले पाहिजे. यापुढे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा उभारणार आहे.’’ या वेळी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, कार्याध्यक्ष सुनील बाबर, उपाध्यक्ष कल्याणराव पिसाळ, आनंद जाधव, सागर गायकवाड, अमोल शिंदे, सूरज कीर्तिकर, रिजवान शेख, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.

टोलमाफी द्यावी

टोलनाक्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले, वाई तालुका व सातारा तालुक्याच्या हद्दीवर असलेला टोलनाका बंद झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यातील वाहनांसाठी टोलमाफी दिली गेली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनास आमचा पाठिंबा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : हवामान विभाकडून पावसाचा ग्रीन अलर्ट, पण...; आणखी किती दिवस राहणार रिपरिप?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Atal Setu : १७ हजार कोटींचा अटल सेतू, १७ महिन्यात खड्डे; MMRDA म्हणते, पावसामुळे झालं, कंत्राटदाराला १ कोटी दंड

Latest Marathi News Updates : स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात ३७.८ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT