सातारा

निकृष्ट कठड्यांमुळेच पाच जणांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह!

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : गावाच्या हद्दीत असणाऱ्या तारळी नदीच्या दोन पुलांमधील निकृष्ट, दर्जाहीन संरक्षक कठडा नायर कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामामुळे आजवर अनेक दुचाकी आणि चारचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. काल झालेल्या अपघाताने यावर शिक्कामोर्तब केला आहे. 

गेल्या वर्षी नीरा नदीवरील दोन्ही पुलांमध्ये संरक्षक कठडा नसल्याने कार नदीपात्रत कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता. यानंतर महामार्ग रस्ते विकास महामंडळास जाग आली आणि पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सर्व पुलांचा सर्व्हे करून दोन्ही पुलांमध्ये असणाऱ्या रिकाम्या जागेवर संरक्षक कठडे बसवले होते; परंतु हे संरक्षक कठडे बसवताना कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलांमध्ये बसवण्यात आलेले संरक्षक कठडे हे मजबूत किती आहेत, त्यात वापरण्यात आलेले साहित्य कोणत्या दर्जाचे वापरले आहे, अशा अनेक त्रुटी असल्याने या कठड्यांबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. काल झालेल्या अपघातात संरक्षक कठड्यांचा सिंमेटचा गठ्ठाच बससोबत खाली कोसळला आहे. यामुळे संरक्षक कठड्यांमध्ये कोठेही सळई आढळून येत नाही. यामुळे घटनास्थळावर संरक्षक कठड्यांच्या दर्जाबाबत अनेक शंका नागरिकांनी उपस्थित केल्या आहेत, तसेच संरक्षक कठडा मजबूत असता तर मिनी बस कठड्याला धडकून नायर कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचला असता अशी चर्चाही घटनास्थळी सुरू होती. 

रस्ते विकास महामंडळाला जाग येणार?
 
अपघातामुळे रस्ते विकास महामंडळाच्या दर्जाहीन कामाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता तरी संबंधित विभागास जाग येणार का? अजून किती कुटुंबांचा जीव दर्जाहीन कामामुळे घेतला जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT