सातारा

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

सकाळ डिजिटल टीम

कऱ्हाड /काशीळ ः सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार रात्रभर, तसेच बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली. काढणीला आलेली पिके हातची जाण्याची स्थिती आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने कृष्णा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने जनजीवनही विस्कळित झाले आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. पाचगणीत पावसाचे पाणी दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
 
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ऊस, मका, ज्वारी, भात आदी पिके कोलमडून पडली आहेत. शेतात पाणी साचत असल्याने ही पिके कुजू लागली आहेत. मंगळवारी पश्‍चिमेकडील पाटण, सातारा, कऱ्हाड या तालुक्‍यांना पावसाने झोडपून काढले.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

खरिपातील काढणीस आलेली सोयाबीन, भात, भुईमुगासह कडधान्य व तृणधान्याची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्वारीलाही फटका बसला आहे. ज्वारीची कणसे पावसाने काळी पडली आहेत. काही ठिकाणी ज्वारीही भुईसपाट झाली आहे. कोथिंबीर, फ्लॉवर, कोबीमध्येही पाणी साचून नुकसान झाले. फ्लॉवर काळे पडले तर कारले, काकडीही भुईसपाट झाली आहे. पेरूच्या बागांचेही नुकसान झाले आहे. माण, खटावसह कोरेगाव तालुक्‍यात कांद्याची हानी झाली आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्‍यांत स्ट्रॉबेरीच्या लागवडीही ठप्प आहेत. झालेल्या लागवडीतही पाणी साचल्याने स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्‍यता आहे. कऱ्हाड तालुक्‍यात काही ठिकाणी आडसाली ऊस वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. पाटण तालुक्‍यात ओढ्यालगतची भाताची पिके वाहून गेली. पावसाने गुऱ्हाळेही बंद ठेवावी लागली. पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सावित्रीबाई फुलेंच्या गावाला आठ कोटी द्या, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्‍यांतही पाऊस आहे. तेथील बाजरी, खरीप ज्वारी, मका, कांदा तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे बी वाया जाण्याची भीती आहे. 

मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिके इरडली आहेत. वाऱ्यामुळे भात, ज्वारी कोलमडली आहे. काढणीला आलेली पिके हातची जाणार आहेत. 
- नवनाथ शिंदे, मोरगिरी (ता. पाटण) 


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT