Karad Municipality esakal
सातारा

कऱ्हाडात जनशक्ती, लोकशाही आघाडी आक्रमक

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : वर्षभरापासून पालिकेची (Karad Municipality) मासिक सर्वसाधारण, तर सहा महिन्यांपासून स्थायी समितीची बैठक झालेली नाही. त्या दोन्ही न झाल्याने विकासकामांचे तब्बल २०० हून अधिक विषय मंजुरीअभावी रखडले आहेत. त्याचा विकासावर परिणाम होतो आहे. त्यामुळे ती कामे मार्गी लागावीत, यासाठी लोकशाही व जनशक्ती आघाडीने मासिक बैठक घ्याव्यात, अशी मागणी वेगवेगळ्या पत्रांद्वारे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde), मुख्याधिकारी रमाकांत डाके (Ramakant Dake) यांच्याकडे केल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामळे दोन्ही आघाड्यांकडून जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे.

वर्षभरापासून पालिकेची मासिक सर्वसाधारण, तर सहा महिन्यांपासून स्थायी समितीची बैठक झालेली नाही.

पालिकेत मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ सुरू आहे. पालिकेची मुदत संपेपर्यंत अद्यापही दोन मासिक सभा होतील, अशी अपेक्षी आहे. काही नगरसेवकांना सभा होऊ द्यायची नाही तर लोकशाही, जनशक्ती आघाडीला सभा हवी आहे, अशी स्थिती आहे. सभा न झाल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. सभा झाल्यास ती मार्गी लागतील, अशी भूमिका घेऊन दोन्ही आघाड्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी वेगवेगळी पत्रे लिहून मासिक व स्थायी समिती घेण्याची मागणी नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. मासिक बैठक न झाल्याने विकासकामांवर परिणाम होतो आहे, अशी भूमिका घेत जनशक्तीने नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी डाके यांच्याकडे मासिक सभेची मागणी केली आहे.

मासिक सभेची मागणी मान्य न झाल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे जनशक्तीकडून सभा घेण्याची मागणी केली जाणार आहे. पालिकेत तब्बल वर्षापूर्वी मासिक सर्वसधारण सभा, तर किमान सहा महिन्यांपूर्वी स्थायी समितीची सभा झाली आहे. दोन्ही सभा व्हाव्यात, यासाठी लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. गटनेते सौरभ पाटील यांनी त्याचे लेखी पत्र नगराध्यक्षा शिंदे, मुख्याधिकारी डाके यांना दिले आहे. सभाच न झाल्याने विकासावर होणार परिणाम घातक आहे. त्यासाठी दोन्ही सभा घ्याव्यात, अशी मागणी गटनेते श्री. पाटील यांनी केली आहे. ती मागणी मान्य न झाल्यास थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे सभा घेण्याची मागणी केली जाणार आहे.

कऱ्हाड शहरातील तब्बल २०० हून अधिक विकासकामे रखडली आहेत. त्यांच्या मंजुरीसह त्यावर चर्चेसाठी सभेची गरज आहे. त्यामुळे सभा घ्यावी, अशी मागणी आहे. मागणी मान्य न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे सभा घेण्याची मागणी करणार आहोत.

-सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी

विविध विकासकामांना मंजुरी अपेक्षित आहे. त्या विषयांना मंजुरीसाठी सभा गरजेची आहे. स्मशानभूमीची कामे, घनकचरा प्रकल्पातील कामांची मंजुरी, पावसामुळे साचणाऱ्या पाण्यावर उपाययोजना करणे आदींसह अन्य कामे रखडली आहेत. सभा न घेण्याचे होणारे राजकारण मारक आहे.

-विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT