सातारा

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : गुन्हेगारांवर वचक निर्माण करून सामान्यांचा विश्वास जिंकण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी आमदार चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार चव्हाण यांनी पोलिस उपअधीक्षक पाटील यांचे स्वागत केले. या वेळी मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण, गजानन आवळकर उपस्थित होते. 

आमदार चव्हाण व पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. कोरोनाची सद्य:स्थितीवरही चर्चा झाली. या वेळी आमदार चव्हाण म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. कोरोना काळात नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामध्ये जागृती करून गर्दी टाळण्याचे मोठे प्रयत्न पोलिस प्रशासनाला करावे लागणार आहेत. डॉ. पाटील यांनी याआधी गडचिरोली व रायगड जिल्ह्यात काम केले आहे. जनतेचा विश्वास संपादन करून जनतेमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकी व गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल, अशी यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गावी गेलेल्या कुटूंबाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू

Mumbai News: दिल्लीतील अग्निकांडानंतर मुंबई फायर ब्रिगेड सतर्क, हॉटेलांवर 'अग्निशमन'ची करडी नजर

SCROLL FOR NEXT