Karad Municipality esakal
सातारा

अर्थसंकल्प फुगविण्याचा जनशक्तीकडून उद्योग; भाजपचे टीकास्त्र

कऱ्हाड पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास नसल्यानेच कोटींची उड्डाणे

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पालिकेच्या (Karad Municipality) आर्थिक स्थितीचा काहीही अभ्यास नसताना केवळ कोट्यवधींच्या आकडेवारीची हुल टाकून अर्थसंकल्प फुगविण्याचा उद्योग जनशक्ती आघाडीने केला आहे. वास्तवातील अर्थसंकल्पाला फाटा देऊन केवळ निवडणुकीच्या तोंडावर आम्ही काही तरी करतोय, तेच दाखविण्यासाठीच्या इगोमुळेच अर्थसंकल्प (Karad Municipal Budget) सात महिने मंजुरीविना पडून राहिला होता, त्यालाही जनशक्ती आघाडीच (Janshakti Aghadi) जबाबदार आहे, असा थेट आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते विनायक पावसकर (BJP leader Vinayak Pawaskar) यांनी केला.

काहीही अभ्यास नसताना केवळ कोट्यवधींच्या आकडेवारीची हुल टाकून अर्थसंकल्प फुगविण्याचा उद्योग जनशक्ती आघाडीने केला आहे.

या वेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक फारुख पटवेकर, सौ. अंजली कुंभार उपस्थित होते. श्री. पावसकर म्हणाले, ‘‘अर्थसंकल्प मंजुरीचा अधिकार स्थायी समितीचा आहे. पालिकेच्या चार स्थायी बैठकीत १३४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झाला. स्थायीत जनशक्तीचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांनीच मंजूर केलेला अर्थसंकल्पाला त्यांनी विशेष सभेत विरोध केला. त्यांनी पुन्हा २७० कोटींची उपसूचना मांडली. १३४ कोटींचे बजेट वास्तवपूर्ण असताना २७० कोटींच्या अर्थसंकल्पाची उपसूचना त्यांनी मांडली.

भाजपच्या नगरसेवकाने अर्थसंकल्प सादर केल्यानेच त्यांचा इगो झाला आहे. त्या वेळी जनशक्तीने ती सूचना मागितली असती तरी आम्ही हरकत घेतली नसती. सूचना मांडल्यानंतर आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सूचना मान्य नाही, असे सांगत बेकायदेशीरपणे उपसूचना मांडली. मात्र, ती लेखी स्वरूपात दिली नव्हती. हा वाद जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये सुधारणा करण्याचे ठरले. मात्र, जनशक्तीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावून दम दिला. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरीस उशीर झाला.

मूळ सूचना फेटाळता येत नाही : पटवेकर

अर्थसंकल्पाची मूळ सूचना फेटाळता येत नाही, असा कायदाच आहे. त्यामुळेच मूळ सूचनेसह अर्थसंकल्प मंजूर झाला आहे, असे माजी उपाध्यक्ष फारुख पटवेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘अर्थसंकल्प प्रशासकीय पातळीवर तयार होतो. त्याला स्थायीत मंजुरी मिळते. मग तो मुख्याधिकाऱ्यांकडून विशेष सभेतच मांडला जातो. त्याची मूळ सूचना कधीच फेटाळता येत नाही. येथे ती फेटाळली तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी ती सूचना तशीच ठेवत उपसूचनेतील बदल स्वीकारून अर्थसंकल्प मंजूर केला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT