Eknathrao Gaikwad esakal
सातारा

स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ

माजी खासदार एकनाथराव गायकवाड हे मुळ जरी कोंडव्याचे असले, तरी त्यांचा जन्म हा बोरखळ (ता. सातारा) येथे त्यांच्या आजोळी झाला होता.

किरण गाडे

कोंडवे (सातारा) : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांचे नुकतेच मुंबई येथील ब्रीच कॅन्डी हॅास्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. हे ऐकून फारच धक्का बसला. मीही बातमी माझ्या कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनाही खूपच दुःख झाले. एकनाथराव गायकवाड हे नात्याने माझे चुलत भाऊ लागत होते. त्यांना सर्वजण आण्णा म्हणत, असे त्यांचे चुलतभाऊ संदीप गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्याविषयी थोडंसं..

आण्णा हे मुळ जरी कोंडव्याचे असले तरी त्यांचा जन्म हा बोरखळ (ता. सातारा) येथे त्यांच्या आजोळी झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील गेल्याने त्यांच्या आजीने त्यांना सांभाळले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बोरखळ येथेच झाले. नंतर त्यांनी पुढील शिक्षण वरळी मुंबई येथे पूर्ण केले. त्यानंतर वेस्टर्न रेल्वेला हमाल म्हणून ते कामाला लागले. कोंडवे गावात तसं त्यांचं येणे-जाणे हे दुर्मिळच. परंतु, ज्यावेळी ते गावी यायचे. त्यावेळी ते आमच्या घरी आवर्जुन यायचे. आमचे आजोबा जोतिराम मनु गायकवाड म्हणजेच नाना व आण्णांचे चांगले संबंध होते. तसे पाहिले तर गाव म्हणून त्यांना त्यांचे घर व जमिनसुध्दा माहिती नव्हती. मग नानांबरोबर थांबून ते गावची माहिती घ्यायचे. नाना हे त्यांचे आजोबाच लागत होते.

नानांच्या निधनानंतर ते त्यांच्या दशक्रीया विधीला स्वतः उपस्थित होते. त्यावेळी मदनदादा भोसले हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यानंतर ते नेहमी गावाशी संपर्क ठेवून असतं. काही अडीअडचण आल्यास ते लगेच फोन करून संपर्क साधायचे. तसेच गावाला यायचे झाल्यास सर्किट हाऊसला थांबायचे व मला फोन करून संदीप तू कुठे आहेस. लगेचच मला भेटायला ये, असेही म्हणायचे. त्यानंतर मी आणि आण्णा एकञ जेवण करून रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसायचो. आण्णा मला नेहमी सांगायचे की, कोणाचेही पाठबळ नसताना इतक्या मोठ्या पदापर्यंत मी पोहोचलो आहे. तरी तुम्ही सुद्धा स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वाने मोठे व्हा. कोणाचाही वशिला घेऊ नका, असे आण्णा नेहमी सांगत होते. आण्णा म्हणजे आमच्या गावातील सर्वात उच्च पदावर गेलेली व्यक्ती त्यामुळे आम्हाला आण्णांचा अभिमान वाटत होता, असेही संदीप गायकवाड यांनी सांगितले.

आण्णांचे वस्तीतील लोकांशी चांगले संबंध होते. ते गावी आल्यावर वस्तीतील लोकांच्या आवर्जुन गाठीभेठी घेत असत. त्यांची शेती आमच्या शेतीजवळच असल्याने आण्णा गावी आल्यावर माझ्या घरी यायचे. समाजासाठी काही करता येत असेल तर आम्हाला सूचवा, असे नेहमीच ते सांगायचे. गावची लोकं मुंबईला गेली तरी आण्णा आपुलकीने चौकशी करत. त्यांचे जे काय काम असेल ते करून त्यांना जेऊ खाऊ घालायचे. खरंच आण्णांनी आमच्या वस्तीतील लोकांची मने जिंकली होती.

-आबा गायकवाड, एकनाथराव गायकवाड यांचे चुलतभाऊ

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT