Prithviraj Chavan News esakal
सातारा

Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभी केलीय का?

सकाळ डिजिटल टीम

'पृथ्वीराज बाबांमुळे माण- खटावला पाणी आले, त्यांचे नाव घेण्याची दानत या आमदारांकडे नाही.'

दहिवडी : देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदारसंघातील (Madha Constituency) पुढील खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल, असं स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं.

भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे, असेही प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख, सुरेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, उदयसिंह पाटील, राजेंद्र शेलार, भानुदास माळी, अल्पना यादव, झाकीर पठाण, जगन्नाथ कुंभार, अमरजित कांबळे, बाळासाहेब माने, एम. के. भोसले, नकुसा जाधव आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत.’’ धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘‘या मतदारसंघात स्वतंत्र लढल्यास खासदार काँग्रेसचाच होईल.’’

मोहन जोशी म्हणाले, ‘‘पृथ्वीराज बाबांमुळे इथला आमदार घडला. पाणी आणण्यामध्ये बाबांचा मोठा हात आहे, तरीही इथला आमदार बाबांचा काही संबंध नाही, असे म्हणत आहे. येत्या निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवून द्या.’’ या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलनायक नव्हे...

माण- खटावमध्ये मी दोन सूतगिरणी उभ्या केल्या. बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभी केलीय का? युवकांना रोजगार मिळावा, म्हणून साखर कारखाना उभारायचे नियोजन मी केले तर लगेच इथला आमदार आडवे पडले.

महादेव जानकरांनी आवाज उठविल्यामुळे सुरू झालेल्या चारा छावण्यांची बिले रखडविण्याचे काम यांनी केले. ज्या पृथ्वीराज बाबांमुळे माण- खटावला पाणी आले, त्यांचे नाव घेण्याची दानत या आमदारांकडे नाही. त्यामुळे हे जलनायक होऊ शकत नसल्याचा टोला रणजितसिंह देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT