Maratha Reservation Village Ban for Political leaders in Satara esakal
सातारा

Maratha Reservation : वातावरण तापलं! चुलीत गेला पक्ष अन् चुलीत गेले नेते; साताऱ्यातील 'या' गावांत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय नेत्यांना गावांचे सीमोल्लंघन बंद होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

गावबंदीच्या ठिणगीचे ज्वालामुखीत रूपांतर होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करावी.

सातारा : अंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी गावबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण उसळले आहे. दरम्यान, आज राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) जिल्ह्यातील प्रत्येक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याबरोबरच राजकीय नेत्यांचे फलकही गावात लावून देऊ नये, असे आवाहन केले आहे.

त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय नेत्यांना गावांचे सीमोल्लंघन बंद होणार आहे. मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रतिसाद मिळत आहेत. सरकारने घेतलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी रविवारी (ता. २२) अंतरवाली सराटी राजकीय नेत्यांसाठी बंद करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय चक्री उपोषण तसेच गुरुवारी (ता. २६) कॅण्डल मार्च काढण्याचे आवाहन राज्यातील मराठा समाजाला केले आहे. जरांगे यांच्या आवाहनाचे पडसाद जिल्ह्यातही तीव्रपणे उमटू लागले आहेत. गावबंदीची जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ (ता. सातारा) येथे पडली. चुलीत गेला पक्ष व चुलीत गेले नेते अशा आशयाचे बॅनर गावातील चौकात लावण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरले आहे.

आजवर जिल्ह्यातील किमान दहा गावांनी यात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, उद्या जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तरीही राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत तातडीने कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यकर्त्यांची ही उदासीनता लक्षात घेता राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चा पुढे आला आहे. त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे.

गावबंदीच्या ठिणगीचे ज्वालामुखीत रूपांतर होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करावी. तसे फलक गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी लावावेत. कोणत्याही पक्षाचे तसेच नेत्याचे बॅनर गावात लावू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांबाबत तरुण वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने गावबंदीच्या ठिकाणी जाऊ नये, अन्यथा परिणामांना नेते जबाबदार असतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

साखळी उपोषणही...

मोरगिरी, नरळे (ता. पाटण), कातरखटाव, निमसोड (ता. खटाव), वहागाव, खोडशी, खुबी, ओंड (ता. कऱ्हाड), लिंब (ता. सातारा) या गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर फलटण व पाटणमध्ये साखळी उपोषणाची तयारी सुरू आहे. गावबंदीचे बॅनर मोफत देण्याचा निर्णय साताऱ्यातील पी. दत्ता, तर लोणंदमधील शिवमुद्रा फ्लेक्स आर्टस्‌ यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त! वाढत्या तेलदरांचा परिणाम; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Mumbai Mayor Cup Carrom Tournament: कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा! महापौर चषकात एकतर्फी विजयाने सर्वांचे लक्ष वेधले

Solapur Accident: कार अन्‌ टिप्परच्या धडकेत ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; अहिल्यानगर-टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव येथे भीषण अपघात, तिघेजण जखमी..

मुंबई-बंगळूर 'वंदे भारत स्लीपर' पुणेमार्गेच, दर राजधानीपेक्षा जास्त; २०० किमी प्रवास केला तरी ४०० किमीचं भाडं द्यावंच लागणार

Nashik: लग्नानंतर सासरचं नाव लावण्यावरून वाद, जबरदस्तीने गर्भपात अन् ३ कोटींची मागणी; महिला लोकप्रतिनिधीच्या डॉक्टर पतीला अटक

SCROLL FOR NEXT