Balasaheb Patil esakal
सातारा

अंतवडीत जलसंधारण तलावाचे काम युद्धपातळीवर; तालुक्यातील 385 एकर क्षेत्राला होणार 'लाभ'

मसूरचा पूर्व भाग दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो. या परिसरात शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती.

गजानन गिरी

मसूर (सातारा) : अंतवडी येथील साठवण तलावाच्या कामाची पाहणी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. मंत्री पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा तलाव मंजूर झाला आहे. जलसंधारण विभागामार्फत त्याचे बांधकाम सुरू आहे.

मंत्री पाटील यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, "सह्याद्री'चे संचालक माणिकराव पाटील, कोपर्डे हवेलीचे सरपंच नेताजी चव्हाण, अंतवडीचे सरपंच युवराज शिंदे, सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, बापूराव शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र शिंदे, अभियंता श्रीकांत आढाव, कनिष्ठ अभियंता वृषाली वाघमारे, ठेकेदार विजय देसाई, ग्रामस्थ उपस्थित होते. तलावाचे बांधकाम उत्कृष्ट करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केल्या.

मसूरचा पूर्व भाग दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो. या परिसरामध्ये शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आघाडी शासनाच्या काळात या तलावाला मंजुरी मिळवून 2014 मध्ये या तलावाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जलसंधारण तलावाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तलावामध्ये साठवल्या जाणाऱ्या पाण्यामुळे अंतवडी येथील 385 एकर क्षेत्र ओलिताखाली येईल. परिसरातील बोअर व विहिरींना पाण्याचा उद्भव वाढून शेती बागायती होईल.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT