सातारा

हे सर्व ठरवून चाललंय; भाजपवर शशिकांत शिंदेंचे शरसंधान

उमेश बांबरे

सातारा : महाराष्ट्राबद्दल भाजपचे इतके प्रेम काही की त्यांनी येथील उद्योग धंदे, योजना, शासकीय कार्यालये गुजरातला घेऊन गेलेत. आता उत्तर प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र तोडायचा, मोडायचा आणि राग काढायचा हा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. दर वेळेला गळा काढणारे भाजपचे नेते याविषयावर का बोलत नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज मुंबईत आले आहेत. बॉलिवूड निर्मात्यांसोबत तसेच राज्यातील उद्योजकांसमवेत ते चर्चाही करणार आहेत. काही वेळापुर्वी योगी आदित्यनाथ यांनी मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. हा सर्व खटाटाेप उत्तर प्रदेशातील आर्थिक गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांचा सुरु असल्याची टीका हाेऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काॅंग्रेस तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी हा दाैरा म्हणजे इथलं आहे ते आपल्याकडे पळवापळवी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत आहेत.

ओढून ताणून मुंबईतून काही नेण्याचा प्रयत्न केला तर...! मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्राबद्दल त्यांना प्रेम आहे का नाही. त्यांनी सगळ्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी येथे येऊन वातावरण निर्मिती करायची त्यानंतर वत्कृत्व करायचे आणि बैठका घेऊन एक प्रकारे अपमान असून हे आव्हानही आहे. ही परिस्थिती भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर वाढीला लागली आहे. पहिले असे कधीही होत नव्हते. आता कोणाचीही चौकशी असो, कोणाची माहिती घेताना महाराष्ट्र सरकारची परवानगीची भिती न बाळगता कार्यवाही केली जात आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला अशी सापत्न वागणूक देण्याचा प्रकार भाजपकडून होत असेल तर महाराष्ट्रातील जनतेने विचार करून याविरोधात उठाव करायला हवा. त्यांचे हे सर्व ठरवून चाललेले आहे. हे भाजपचे महाराष्ट्राविषयी प्रेम नसुन व्देष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फिल्म इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही: अनिल देशमुख

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT