Railway
Railway  esakal
सातारा

Ashwini Vaishnav : 'या' तालुक्यांत रेल्वे आणण्याची भाजप आमदाराची तयारी; रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या महत्वाच्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

आमदार गोरे यांनी पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडं केली.

सातारा : जलसंधारण, एमआयडीसी, पुणे-बंगळुरू ग्रीन महामार्गानंतर आता आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी माण, खटाव तालुक्यांत (Man, Khatav) प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे आणण्याची तयारी केली आहे.

पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग (Railway) मिळावा, अशी मागणी श्री. गोरे यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे केली. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी (Ashwini Vaishnav) या मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माण तालुक्यात जागा उपलब्ध असल्याने येथे कॉरिडॉर एमआयडीसी उभारली जाणार आहे. या विकासाच्या गतीला वेगाने व सुखकर प्रवास करणे शक्य होण्यासाठी नवीन लोहमार्ग माण तालुक्यातून नेण्यासाठी आमदार गोरेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुसेगाव-दहिवडी-म्हसवड-माळशिरस-पंढरपूर लोहमार्ग मिळावा, अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे केली.

Railway Minister Ashwini Vaishnav

या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. या मागणीवरून रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी सातारा ते पंढरपूर मार्गासाठी सर्व्हे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या मार्गासाठी रेल्वे मिळाल्यानंतर माण, खटाव भागासाठी दळणवळण सुखकर आणि कमी खर्चाचे होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT