सातारा : रेल्वेला मिळेना ग्रीन सिग्नल!
सातारा : रेल्वेला मिळेना ग्रीन सिग्नल!  sakal
सातारा

सातारा : रेल्वेला मिळेना ग्रीन सिग्नल!

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक : रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि कर्नाटक भागाला जोडणाऱ्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. कऱ्हाड ते कुर्डुवाडीपर्यंत लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वर्षभरापासून पूर्ण असून, त्या मार्गावर विजेवरील रेल्वेगाड्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांतून नाराजीचा सूर आहे. या मार्गावर विजेवरील रेल्वे सोडण्यास मुहूर्त कधी सापडणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

कऱ्हाड ते कुर्डुवाडी हा सुमारे १६५ किलोमीटरचा लोहमार्ग दोन टप्प्यात आहे. त्यामधील मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कऱ्हाड ते मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. कुर्डुवाडीसह पंढरपूर, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, भिलवडी व कऱ्हाड ही महत्त्‍वाची स्थानके या मार्गावर आहेत.

दुहेरीकरण झालेल्या शेणोली, भवानीनगर, ताकारी टप्प्यातील मार्ग सध्या दुहेरी वाहतुकीसाठी वापरला जात आहे. मात्र, त्या मार्गावरील विद्युतीकरण वापराविना आहे. सध्या काही मालगाड्या विजेवरील इंजिनासह सोडल्या जात आहेत. विशेषतः मिरज ते कुर्डुवाडी मार्गावर मोठ्या संख्येने विजेवरील मालगाड्या धावत आहेत. प्रवासी गाड्यांना मात्र त्याचा फायदा झालेला नाही. रेल्वे बोर्डाने विद्युतीकरणाची चाचणी घेऊन हिरवा कंदीलही दाखवला आहे. तरीही डिझेलवरील गाड्याच सोडल्या जात आहेत. कोट्यवधी रुपये गुंतवून पूर्ण केलेले विद्युतीकरण वापराविना पडून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT