Koyna Dam esakal
सातारा

दिलासादायक! साताऱ्यातील प्रमुख धरणांत 75 टक्के पाणीसाठा

कोयना धरणातून 45 हजार 358 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस (Heavy Rain) पूरग्रस्तांसाठी हानीकारक ठरला असलातरी प्रमुख धरणात (Dam) पाणीपातळीत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणात 75 टक्केवर पाणीसाठा झाला आहे. या धरणातील पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात पाणी सोडले जात आहे.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यावर धरणे भरणार, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यावर धरणे भरणार, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठी चिंता कमी झाली आहे. सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर मुसळधार पावसामुळे धरणात कमी कालवधीत जास्त पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडावे लागल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आला आहे.

सध्या कोयना धरणातून 45 हजार 358 क्युसेक (Koyna Dam) पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या कोयना एकूण 84.86 टीएमसी म्हणजेच 80.62 टक्के धरण भरले आहे. धोम धरणात 10.39 टीएमसी म्हणजेच 76.99 टक्के असून 534 क्युसेक कण्हेर धरणात 7.74 टीएमसी म्हणजेच 76.62 टक्के असून 574 क्युसेक, धोम-बलकवडी धरणात 3.38 टीएमसी म्हणजेच 82.72 टक्के असून 267 क्युसेक, तारळी 5.03 टीएमसी म्हणजेच 85.87 टक्के असून 1712 क्युसेक, उरमोडी धरणात 7.49 टीएमसी म्हणजेच 75.21 टक्के 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या धरण क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवकेत वाढ होत असल्याने विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT