कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप sakal
सातारा

सातारा : कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप

नवीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या विविध भागात आंदोलने

- हेमंत पवार

कऱ्हाड : नवीन तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचा आनंदोत्सव बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज शुक्रवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील दत्त चौकात साजरा केला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने साखर वाटप करण्यात आले.

नवीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या विविध भागात आंदोलने झाली. त्याचबरोबर दिल्लीच्या सिमेवर गेले अनेक महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले.

अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले. दरम्यान मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठीमार खाल्ला, खलिस्तानी, दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला आणि देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो, असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

त्याचा आनंद आज बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, तात्या पाटील, उत्तमराव खबाले, आनंदराव थोरात, पांडुरंग जगताप, मनोज हुबाले, संपत जगताप, सैफ मुल्ला व शेतकऱ्यांनी दत्त चौकात साखर वाटुन साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT