सातारा

'या' जिल्हा परिषदेला लागली 56 कोटींची लॉटरी!

उमेश बांबरे

सातारा : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगातून सातारा जिल्हा परिषदेला तब्बल 56.70 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 80 टक्के निधी हा ग्रामपंचायतींना वर्ग होणार आहे, तर उर्वरित प्रत्येकी दहा टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समितींना दिला जाणार आहे. या वेळेस 2020-21 च्या आराखड्यात दिल्याप्रमाणे या निधीतील 50 टक्के निधी हा स्वच्छता, पाणीपुरवठा, जल पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या आदी कामांसाठी वापरावा लागणार आहे.
 
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगातून आजपर्यंत थेट ग्रामपंचायतींना 100 टक्के निधी जात होता. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून कोणतीही कामे सूचविता येत नव्हती. ग्रामपंचायतींकडून थेट आपल्या आराखड्यात समाविष्ट कामांना प्राधान्य दिले जात होते. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केंद्र शासनाकडे मागणी करून या निधीतील काही निधी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला खर्च करण्यासाठी द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार यावर्षी पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीची विभागणी करण्यात आली आहे.
 
नवीन निर्णयानुसार आता ग्रामपंचायतींना केवळ 80 टक्के निधी मिळणार आहे. उर्वरित निधीपैकी दहा टक्के निधी हा प्रत्येकी जिल्हा परिषद व पंचायत समितींना दिला जाणार आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेला मिळालेल्या 56 कोटी 70 लाख 43 हजार रुपयांच्या निधीतून ग्रामपंचायतींना 45 कोटी 36 लाख 35 हजार रुपये दिले जाणार आहेत, तर जिल्हा परिषदेला दहा टक्के म्हणजेच पाच कोटी 67 लाख व पंचायत समितींना पाच कोटी 67 लाख रुपये दिले जाणार आहेत.

सिव्हिलमधील डायलिसिस यंत्रणा सुरू; हजारो रुपये वाचणार

या 15 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून 50 टक्के निधी हा स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांशी संबंधित कामे करावी लागणार आहेत. सध्या कोरोना संसर्गाची स्थिती असल्याने ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी या निधीचा वापर करता येणार आहे. उर्वरित 50 टक्के निधीतून इतर कामे ग्रामपंचायत करू शकणार आहे. त्यामध्ये महिला बालकल्याण, आरोग्य, रस्ते दुरुस्ती, गटार बांधकाम यांचा समावेश आहे. 2020- 21 च्या ग्रामपंचायतींच्या आराखड्यात कोणती कामे सूचविली आहेत. त्यानुसार या आराखड्यातील 50 टक्के निधीचा वापर ग्रामपंचायती करू शकणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मिळालेला दहा टक्के निधी हा त्यांच्या सदस्यांकडून सूचविल्या जाणाऱ्या कामांवर खर्च केला जाणार आहे. 

  • जिल्हा परिषदेला मिळालेला एकूण निधी : 56 कोटी 70 लाख 43 हजार 
  • ग्रामपंचायतींना मिळणारा निधी : 45 कोटी 36 लाख 35 हजार 
  • जिल्हा परिषदेकडे राहणारा निधी : 5 कोटी 67 लाख 
  • पंचायत समितीला जाणारा निधी : 5 कोटी 67 लाख 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT