Satara Farmers face crisis heat cooling strawberry
Satara Farmers face crisis heat cooling strawberry  sakal
सातारा

Satara: शेतकऱ्यांपुढे संकट;उष्णतेतील वाढ,अपुऱ्या थंडीचा परिणाम स्ट्रॅाबेरी उत्पादनात तीस टक्के घट

विकास जाधव -@vikasjsakaal

काशीळ - महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीच्या उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणातील बदलाचा फटका बसू लागला आहे. अचानक उष्णेत झालेली वाढ व अपुऱ्या थंडीमुळे स्ट्रॅाबेरीच्या उत्पादनात ३० टक्के घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

स्ट्रॅाबेरी फळ थंड हवेत येत असल्यामुळे राज्यात सर्वाधिक महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॅाबेरीची लागवड होते. या हंगामातही सुमारे अडीच ते तीन हजार एकर दरम्यान स्ट्रॅाबेरीची लागण झाली आहे.

स्ट्रॅाबेरीस वन्यप्राणी तसेच काही प्रमाणात अतिपावसाचा फटका बसला होता. मात्र, या संकटातून मात करत शेतकऱ्यांनी स्ट्र्रॅाबेरी आणली होती. हंगामही वेळेत सुरू होऊन दरही समाधानकारक मिळत असल्याने या हंगामापासून शेतकऱ्यांना आशा निर्माण झाल्या होत्या.

मात्र, ऐन हंगामाच्या भरात थंडी गायब होण्याबरोबरच उष्णतेत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

थंडी कमी होण्यामुळे फळाच्या आकार, दर्जा तसेच योग्य वेळेत काढणी होत नाही. अचानक उष्णेत वाढ होण्यामुळे फुलगळ होणे,

कमी आकारमानाची फळे पक्व होणे, फळांवर डाग पडणे तसेच लालकुळीचा प्रादुर्भाव वाढ झाल्याने स्ट्रॅाबेरीच्या एकूण उत्पादनास फटका बसला आहे.

त्यामुळे उत्पादनात ३० टक्के घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दर्जेदार म्हणजेच एक नंबर दर्जाची स्ट्रॉबेरी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दरापासून वंचित राहावे लागत आहे,

तसेच बहुतांशी हा माल प्रक्रियेसाठी द्यावा लागत असल्याने अपेक्षित पैसे मिळत नाहीत.उष्णता वाढीमुळे फुलगळ होत असल्यामुळे फळाविना झाडे पोसण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.

अशीच परिस्थिती राहिल्यास या हंगामात ५० टक्के उत्पादनात घट होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. स्ट्रॅाबेरीस भांडवली खर्च जास्त असल्याने वातावरणातील बदल हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे.

दरात स्थिरता..

स्ट्रॅाबेरीच्या उत्पादनात घट झाली असली, तरी दर मात्र टिकून आहेत. एक नंबरच्या दर्जेदार स्ट्रॅाबेरीस प्रतिकिलोस १०० ते १३० रुपये,

तर दोन व तीन नंबरच्या प्रक्रियेस जाणाऱ्या स्ट्रॅाबेरीला प्रतिकिलोला ५५ ते ६५ रुपये दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मात्र, दर समाधानकारक असले, तरी उत्पादनात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम येत नाही. एकूणच वातावरणातील बदल शेतकऱ्यांना तोट्याचा ठरत आहे.

वातावरणातील बदलामुळे स्ट्रॅाबेरीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे फळे आकाराने लहान असतानाच पक्व होत आहे. फुले कमी येत असल्यामुळे उत्पादनात घट होत आहे.

- रामदास महाडिक, शेतकरी, घोटेघर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा.

महाबळेश्वरमध्ये दिवसाचे ३० च्या वर, तर रात्री १५ अंश सेल्सिअसच्या आत तापमान येत आहे. दुपारच्या वेळात तापमानात वाढ होत असल्याने फळाच्या रंगावर परिणाम होत आहे.

शेतकऱ्यांनी शेडनेट, तसेच शेताच्या बांधावर स्वीट कॅार्न यासारखी पिके लावणे गरजेचे आहे. शेतातील तापमान नियंत्रण कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- दर्शन कदम, सहायक प्राध्यापक, गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT