Satara Latest Marathi News 
सातारा

कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार द्या, अन्यथा 'रास्ता रोको'

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : अतिवृष्टीची नुकसानभरपाई, पीकविमा, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तातडीने मिळावेत, अन्यथा गुरुवारी (ता. 25) म्हसवड येथे सहा गावांच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

याबाबत तहसीलदार बी. एस. माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, काळचौंडी या सहा गावांचे शेतकरी विनंती अर्ज करतो की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर पंचनामेही करण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप परिसरातील कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमाही मिळालेला नाही.

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता 50 रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले असताना आजपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करावयाचे आहे. तत्पूर्वी सर्व मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून लवकरात लवकर वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई, पीकविमा आणि प्रोत्साहनपर भत्त्याची रक्कम जमा करावी, अन्यथा नाईलाजास्तव गुरुवारी (ता. 25) पंचक्रोशीतील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT