सातारा

वाह, क्या बात है! वाढदिनी गटविकास अधिकाऱ्यांनी बांधले केळघर परिसरात बंधारे

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : वाढदिवसादिवशी कोणताही बडेजावपणा न करता जलसंधारणाचे काम करून केळघर परिसरात गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सपत्नीक श्रमदान करून ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने एकाच दिवसात तीन वनराई बंधारे बांधले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी पातळीत निश्‍चित वाढ होईल, असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला. 

जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त केळघर येथे वनराई बंधाऱ्याच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सतीश बुद्धे, मयूरी बुद्धे, विस्तार अधिकारी श्री. सानप, केळघरचे सरपंच रवींद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, शिक्षक बॅंकेचे संचालक शंकर जांभळे, ग्रामसेवक आर. बी. सपकाळ, अमोल गायकवाड, एन. के. जाधव, एस. एच. निर्मल, संतोष देशमुख, अधिक जाधव, सुनील देशमुख, संदीप सावंत, संजय जुनघरे उपस्थित होते. 

श्री. बुद्धे म्हणाले, "केळघर परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, तीव्र उताराची जमीन असल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे वाढदिवसादिवशी अनावश्‍यक खर्च टाळून जलसंधारण करण्यासाठी वनराई बंधारे उभे करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला सर्वांनीच साथ दिल्यामुळे केळघरला दोन बंधारे व पुनवडीत एक बंधारा असे तीन बंधारे उभे राहिले आहेत. भविष्यात महसूल विभाग, कृषी विभागाच्या सहकार्यातून केळघर परिसरात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवू. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT