मायणी बँक ऑफ इंडिया
मायणी बँक ऑफ इंडिया 
सातारा

बॅंकेच्या कामांमध्‍ये आता समस्यांचे नवे फेरे...

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : येथील बॅंक ऑफ इंडियाच्या पायरीपर्यंत पोचण्यासाठी खातेदारांना किमान तासभर कडक उन्हात तिष्ठत उभे राहावे लागत आहे. पाऊस अंगावर झेलावा लागत आहे. त्यामुळे शाखा प्रमुखांनी ग्राहकांसाठी तात्पुरते निवारा शेड उभारण्यासह जलदगतीने सेवा देण्याची मागणी लोक करीत आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, मायणी अर्बन बॅंक, मनमंदिर को. ऑपरेटिव्ह बॅंक या सहकारी बॅंकांबरोबर बॅंक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकमेव शाखा आहे. येथील बाजारपेठ मोठी असून, अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार त्या बॅंकेमार्फत होत असतात. सरकारी व निमसरकारी सेवेतील सेवानिवृत्त, पेन्शनर लोकांची खातीही तेथे आहेत. शेतकरी, नागरिकांना मिळणारी विविध शासकीय अनुदाने, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शाळांची अनुदाने, बचत गटांची कर्ज प्रकरणे यासह विविध संस्थांचे आर्थिक व्यवहारही बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत होत असतात. त्यामुळे चांदणी चौकातील या बॅंकेपुढे सतत लोकांची गर्दी दिसून येते. 

अशा स्थितीत पुरेसा स्टाफ असूनही अनेकदा एकाच खिडकीद्वारे बॅंकेत देवाण- घेवाण होत असते. त्यामुळे गर्दी कमी होताना दिसत नाही. बॅंकेसाठी स्वतंत्र वायरलेस नेटवर्कची सुविधा असतानाही अनेकदा नेट नसल्याचे सांगून सामान्य अडाणी नागरिक खातेदारांना माघारी पाठवले जाते. पासबूक भरून वा छापून देण्यासही अनेकदा टाळाटाळ केली जाते. कधी कर्मचारी नसल्याचे तर कधी प्रिंटर बिघडल्याचे कारण पुढे करण्यात येते. बॅंक कर्मचारी व अधिकारी जलद गतीने सेवा देत नाहीत. त्यामुळे लोक त्रासून जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य व सुरक्षित अंतर राखण्यामुळे बॅंकेबाहेर भली मोठी रांग लागत असते. रांगेतील लोकांना कधी कडक उन्हात ताटकळत उभे राहावे लागते, तर कधी अंगावर पाऊस झेलावा लागतो. बॅंकेकडून ग्राहकांसाठी निवाऱ्याची व रांगेसाठी कसलीही स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे निवाऱ्यासाठी लोक गर्दी करून सुरक्षित अंतराचा फज्जा उडत आहे. अनेकदा सामान्य, आडाणी खातेदारांना हवी ती ग्राहक सेवा दिली जात नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी बॅंक व्यवस्थापनाने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. रांगेसाठी व्यवस्था करावी. लोकांना जलद सेवा देऊन कमीतकमी वेळेत लोक सुरक्षित घरी परत जातील याची दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. 

बॅंकेत जायचं म्हटलं, की अंगावर काटा येतो. अगदी किरकोळ कामासाठीही तास, दोन तास ताटकळत उभे राहावे लागते. कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही. सेवा जलद हवी. 
- विजयराव खलिपे, मायणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT