'Fasttag' Sakal
सातारा

सातारा : टोल चुकवेगिरीला ‘फास्टॅग’मुळे लागला लगाम

‘फास्टॅग’ने त्या अवजड वाहनांना लगाम लागल्याने शहरीसह ग्रामीण भागातील नागरी वस्तीला दिलासा मिळाला आहे.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : टोलनाक्यावरील ‘फास्टॅग’ने (Fasttag) तासवड्यातील टोल चुकवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला (National Highway) पर्याय शहरी व ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ घटली आहे. ‘फास्टॅग’ने त्या अवजड वाहनांना लगाम लागल्याने शहरीसह ग्रामीण भागातील नागरी वस्तीला दिलासा मिळाला आहे. रस्त्यांचा दर्जाही चांगला राहण्यास हातभार लागणार आहे.

शहरीसह ग्रामीण भागातील तब्बल २० किलोमीटरच्या मार्गावरून जाणारी अवजड वाहने त्या भागातील स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनली होती. अवजड वाहने जाणारा गजबजलेला व नागरी वस्तीचा भाग होता. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ स्थानिकांच्या जीवावर बेतत होती. त्यात छोटे-मोठे अपघात होऊन किमान ६० जणांना जीव गमवावा लागला होता. अवजड वाहनांकडून होणारी टोल चुकवेगिरी अपघाताला निमंत्रण ठरत होती.

कारण नसताना त्यात लोकांना जीव गमावावा लागत होता. त्यामुळे नागरी वस्तीतून येणारी अवजड वाहने स्थानिक लोकांचे जीव गमावणारी व त्यांना कायमस्वरूपाचे अपंगत्व देणारी ठरली होती. दररोज होणाऱ्या वर्दळीने ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. वाहने जावून त्या रस्त्यांची चाळण झाल्याने पर्यायाने त्या सगळ्याचा खर्च बांधकाम विभागालाही डोईजड ठरत होता. साताराहून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या सगळ्याच वाहनांना तासवडे येथे अवजड वाहनांना किमान २५० रुपयांचा टोल आहे.

तो चुकविण्यासाठी ही अवजड वाहने महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला उंब्रजहून शिवडे फाट्यावरून मसूरकडे, तेथून कोपर्डे हवेलीमार्गे कऱ्हाड शहरातून कोल्हापूर नाक्याकडे जाणारा मार्ग वाहनधारकांकडून वापरला जात होता. अवजड वाहने टोल चुकवण्यासाठी तो फंडा वापरत होते. मात्र, त्याच फंड्याला फास्टॅगने मात्र लगाम लावला आहे. फास्टॅगमुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक जवळपास बंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरी वस्तीने मोकळा श्वास घेतल्याचेच दिसते.

अवजड वाहनामुंळे या भागाने घेतला मोकळा श्वास

- कोल्हापूर नाका

- दत्त चौक

- कृष्णा कॅनॉल

- विद्यानगर

- बनवडी फाटा

- कोपर्डे हवेली

- यशवंतनगर

- शिरवडे फाटा

- मसूर

- कोरेगाव फाटा

- शिवडे फाटा

अपघातही घटले...

अवजड वाहनांमुळे कोल्हापूर नाक्यासह दत्त चौक व कृष्णा कॅनॉल चौक व ग्रामीण भागात वर्षभरात पन्नास अपघात झाले होते. त्या अपघातांतही घट झाल्याची नोंद आहे. यापूर्वी अवजड वाहनांनी ठोकरल्याने किमान ५० लोकांना जीव गमवावा लागला होता. अपघातग्रस्त किमान २० मोठी वाहने पोलिसांनी जप्तही केली होती. अन्य वाहने अज्ञात होती. पहाटे, रात्री उशिरा अपघातानंतर न थांबताच वाहने तेथून निघून जात होती. त्याचेही प्रमाण आता नगण्य झाल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT