man 
सातारा

"हे' गाव टॅंकरमुक्त... आता वृक्ष लागवडीचा ध्यास!

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड (जि. सातारा) : शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून विरळीतील तरुणांनाही 355 पिंपरण रोपांची लागवड केली. विरळी येथील उजाड आणि बोडक्‍या डोंगरावर गावातील नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ आणि विरळी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षित अंतराचे पालन करत लागवड करण्यात आली. 

मागील दोन वर्षांपूर्वीपासून चालत आलेली जलसंधारणाची चळवळ या वर्षी कोरोनामुळे काहीशा प्रमाणात थंडावली असली तरी विरळी हे गाव टॅंकरमुक्त झाले आहे. गावातील डोंगर झाडावाचून भकास आणि बोडके दिसत असल्याने गावातील तरुणांनी यावर्षी वृक्ष चळवळ हाती घेऊन जवळजवळ 355 पिंपरणीची रोपे लावून शिवराज्याभिषेक आणि पर्यावरण दिन साजरा करत समाजापुढे आदर्श निर्माण केला. 

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे, असे सरपंच प्रशांत गोरड यांनी नमूद केले. श्री. गंबरे म्हणाले, ""निसर्ग मानवाला खूप काही देतो, याची जाण ठेवत प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे. वृक्ष लागवड हा विकासाचाच एक भाग आहे.'' 

यावेळी दत्ता नलवडे, मंडळाचे अध्यक्ष रामदास नलावडे, ग्रामसेवक गंबरे, सदस्य विकास केंगार, प्रकाश गोरड, डॉ. प्रशांत घुटुकडे, पोपट जाधव, बाळासाहेब गोरड, गणेश नलावडे, अंकुश नलावडे, मंडळातील कार्यकर्ते व वृक्षप्रेमी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT