Dr. Bharat Patankar
Dr. Bharat Patankar esakal
सातारा

'बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार का?'

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणाचे (Marathwadi Dam) पाणी बंधाऱ्यांतून उडी मारून लाभक्षेत्रातील शेतकरी आणि तेथे पुनर्वसित झालेल्या धरणग्रस्तांच्या शेतात येणार नाही, हे जबाबदार अधिकाऱ्यांनी अगोदर ध्यानात घ्यावे. यापूर्वी ठरल्याप्रमाणे शासनाने स्वखर्चाने लाभक्षेत्रातील शेतीला पाणी उचलून देण्याबाबत तातडीने नियोजन न केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे (Shramik Mukti Dal) अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (President Dr. Bharat Patankar) यांनी आज दिला. (Shramik Mukti Dal President Dr. Bharat Patankar Warns The Government About Marathwadi Dam Issue bam92)

धरणाच्या लाभक्षेत्रात वांग नदीवर दहा बंधारे बांधले म्हणजे शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असे समजून कसे चालेल?

ते म्हणाले, ‘‘दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्यासमवेत झालेल्या पाटबंधारे विभागाचे (Department of Irrigation) अधिकारी व श्रमिकच्या बैठकीत याप्रश्नी चर्चाही झाली आहे. मराठवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन मूळच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड-पाटण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातही करण्याचा निर्णय २४ वर्षांपूर्वी शासनाने घेत तशी पावलेही उचलली. यातील सांगली जिल्ह्यातील टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेतकरी व पुनर्वसित धरणग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कऱ्हाड व पाटण तालुक्यांत पुनर्वसित झालेले धरणग्रस्त व त्यांना जमिनी देणारे स्लॅबपात्र शेतकऱ्यांचे काय? धरणाच्या लाभक्षेत्रात वांग नदीवर (Wang River in Patan ) दहा बंधारे बांधले म्हणजे शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असे समजून कसे चालेल?

बंधाऱ्यातील पाणी उडी मारून शेतात जाणार आहे का? यापूर्वी शासनाने आणि जबाबदार घटकांनी स्वखर्चाने पाणी शेतात पोचवू, असा शब्द दिला आहे. तो पूर्ण करायलाच हवा. मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील बहुतांश जमिनीची स्थिती बंधारे एकीकडे आणि जमिनी भलतीकडे अशीच आहे. पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवल्याने त्यांच्या शिफारशीने जबाबदार अधिकाऱ्यांनी मंत्रालयात प्रस्ताव सादर करावा.’’ दरम्यान, श्रमिकचे कार्यकर्ते दिलीप पाटील, सुरेश पाटील म्हणाले, ‘‘तत्कालीन आयुक्त अरुण भाटिया व तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी मराठवाडीच्या लाभक्षेत्रास शासन पाणी उचलून देणार, असा शब्द यापूर्वीच दिलेला आहे.’’

या प्रश्नी शासनाने तातडीने निर्णय जाहीर न केल्यास लाभक्षेत्रातील शेतकरी आणि तेथील पुनर्वसित धरणग्रस्त या दोन्ही घटकांना घेऊन आम्हाला लढा उभारावा लागेल. हा संघर्ष तीव्र असेल, याचे भान संबंधितांनी ठेवावे.

-डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

Shramik Mukti Dal President Dr. Bharat Patankar Warns The Government About Marathwadi Dam Issue bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT